आत्तापर्यंत शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं. राष्ट्रवादी पक्ष त्यांच्याच डोळ्यादेखत फुटत आहे. करावं तसं भरावं ही आपल्याकडे म्हण आहे आणि याच म्हणीची प्रचिती शरद पवारांना सध्या येत आहे, अशी टीका खोत यांनी केली आहे.
शरद पवार यांनी वसंत दादा पाटील यांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यावेळी वसंत दादा पाटील यांना किती दु:ख झालं असेल. त्याचं दुख: पवारांना आता कळत असेल, असं खोत यांनी म्हटलं आहे.
राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांनीही पवारांनी जे आधी राजकारण केलं तेच त्यांना भोगायची पाळी आली आहे. माझं सरकार पाडल्यानेच त्यांच्यावर आता अशी पाळी आली आहे, अशी टीका त्यांनी पवारांवर केली होती.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला जोरदार हादरे बसत आहेत. सचिन अहिर, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ, शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपात प्रवेश केला आहे.