पुणे-भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील ज्या कॉंग्रेसपक्षाने अनंतराव थोपटे यांना जीवनभर साथ दिली ,त्याच थोपटे यांच्या चिरंजीवांना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून …त्यांच्या नावाचा जयजयकार करत ,त्यांचे समर्थक म्हणविणाऱ्या टोळक्याने आज सायंकाळी काही माध्यमांचे कॅमेरे बोलवून पुण्याच्या कॉंग्रेस भवनवर पूर्वनियोजनानुसार हल्ला केला .आणि आपल्या गुंडशाहीचे संतापजनक दर्शन घडवून पुणे शहर आणि जिल्ह्यात दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला .या गुंडागर्दी विरोधात पोलीस कायआणि किती कडक कारवाई करतात हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
पुण्यातील भोर वेल्हा मुळशीचे आमदार संग्राम थोपटे हे तीन व वेळा निवडून आले आहेत. तरीदेखील त्यांना मंत्रीपद न दिल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पुण्यातील शिवाजीनगर येथे असलेल्या काँग्रेस कार्यलयाची तोडफोड केली. यावेळी संतत्प कार्यकर्त्यांनी इमारतीच्या काचा फोडल्या तसेच, मुख्य दालनातील खुर्च्या, टेबल आणि इतर वस्तुंचीही नासधुस केली.
महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल पार पडला. यात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली तर जुन्या निष्ठावंताना डावलण्यात आले. अनेकवर्षे पक्षासाठी काम करुनही मंत्रिपद न मिळाल्यामुळे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. यातच आता पुण्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटेंना मंत्रिपद न मिळाल्यामुले त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसले. कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनात प्रचंड तोडफोड केली आहे. तसेच, येत्या काळात जिल्ह्यातून काँग्रेसला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, अशी भूमिकाही कार्यकर्त्यांनी घेतली.