मुंबई-नारायण राणे यांनी शिवसेना सोडून अनेक वर्षे उलटली पण आता म्हणजे आज सकाळी नितेश राणे यांनी ट्विट करून नितेश राणे यांनी धक्कादायक आरोप केल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना सोडल्यावर नारायण राणेंना जीवानिशी संपवण्याचा प्रयत्न झाला. त्यांना मारण्यासाठी पक्षप्रमुखांनी अनेकदा सुपारी दिली होती, असा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांनी केला आहे. नक्षलवाद्यांनी धमकी दिल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा पुरवली नाही, असा आरोप शिंदे गटाकडून होतो आहे. यातच हा आरोप करून नितेश राणे यांनी राजकीयदृष्ट्या केलेले हे विधान ठरले तरी आता अशा विधानांकडे गंभीरपणे पाहिले जाऊ शकणार आहे.
नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जसे एकनाथ शिंदे यांच्यासोबत घडले. तसेच माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली होती, तेव्हा त्यांना संपवण्यासाठी अनेकांना सुपारी दिली गेली होती. ही सुपारी तथाकथित विवेकी आणि सभ्य वाटणाऱ्या पक्षप्रमुखांनी दिली होती. आता जरा ही म्याँव म्यांव संपू दे. मग आम्ही योग्य प्रकारे वस्त्रहरण करू. सगळ्या गोष्टींची व्याजासह परतफेड केली जाईल.