आगामी निवडणुकीसाठी भाजपचा ‘महाविजय 2024’ संकल्प
- हे सरकार बेकायदेशीर सरकार असं म्हणणारांनाच कायदा कळतो काय?
- जे उरले-सुरले १०-१५ आहेत, तेही जातील म्हणून विरोधक घाबरले आहेत
- सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूने निकाल येईल, हा मला पूर्ण विश्वास आहे
- मला जेलमध्ये टाकण्याचा यांचा प्लान होता. परंतु मी यांच्या बापाला घाबरत नाही.
- मी त्यांना पुरुन उरलो. मला जेलमध्ये टाकण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, ते जेलमध्ये गेले
- आमदार श्रीकांत भारतीय हे निवडणूक इन्चार्ज, बावनकुळे-फडणवीस यांची घोषणा
- मला काय मिळणार, याचा विचार न करता कार्यकर्त्यांनी लोकांची सेवा करावी
- हे सरकार गद्दारांचं नसून खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांनी २०१९ मध्ये पाठीत खंजीर खुपसलं ते गद्दार होते
नाशिक-आज जे सरकार राज्यात स्थापन झाले ते गद्दारांचे नसून खुद्दारांचे आहे. 2019 साली लोकांनी दिलेल्या मतांचे अवमान करून गद्दारी करून, पाठीमागे खंजीर खुपसून राज्यात मविआ सरकार स्थापन झाले होते. त्या गद्दारातून खुद्दार बाहेर पडले असून, आता हे खुद्दारांचे सरकार आहे.रोज कुणीही उठून हे सरकार बेकायदेशीर असल्याचे बोलते, पण मी त्यांना सांगू इच्छितो की, कायदा फक्त त्यांनाच कळतो का? कायदा आम्हाला देखील कळतो, संविधान आम्हाला देखील माहिती आहे, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.नाशिकमध्ये आज भाजप कार्यकारिणीची बैठक पाडली त्यावेळी व्यासपीठावर फडणवीस बोलत होते.”या देशामध्ये ज्यांना अहंकार होता त्यांना संपवण्याचे काम हे 2014 पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात होत आहे, सामान्य माणसाचं सरकार काय असतं हे आता सर्वजण पाहतायेत” असे प्रतिपादन फडणवीस यांनी केले,ते (महाविकास आघाडी) रोज सकाळी उठून हे सरकार बेकायदेशीर आहे, असं म्हणतात. कारण त्यांना भीती आहे की, उरले-सुरलेले १०-१५ आमदारही निघून जातील. म्हणून त्यांना दररोज सांगितलं जातं की, हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार अपात्र ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण जिंकणार आहोत. हा संदेश आपल्यासाठी नाही. जे उरले-सुरले आहेत, त्यांच्यासाठी हा संदेश आहे.”“मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काहीही काळजी करू नका. आपण जे केलंय ते नियमाने केलंय. कायद्याने केलंय. कायद्याचा अभ्यास करून केलंय. मला पूर्ण विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आपल्याच बाजुने निकाल लागेल. कारण आपण संविधानासंमत राहून काम केलंय. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला, तर सर्वोच्च न्यायालय उत्तम आहे. पण न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला, तर न्यायालय दबावाखाली आहे. निवडणूक आयोगाबद्दलही त्यांनी असंच म्हटलं आहे. देशातील सर्वोच्च संस्थांवर प्रश्नचिन्ह उमटवण्याचं काम विरोधकांकडून केलं जात आहे,” सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. ते संविधानसंमत आहे. हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करणारच आहे. पण पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात नव्याने दीडपट अधिक जागा जिंकून येणार आहोत. कारण आम्ही जनतेची सेवा आम्ही करत आहोत.” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.
पुढे फडणवीस म्हणाले की, “आगामी निवडणुकीसाठी भाजपचा नवा संकल्प हा भाजपचा ‘महाविजय 2024’ असून लोकसभेसाठी ‘मिशन 45’ विधानसभेसाठी ‘मिशन 200’ असा निर्णय भाजपच्या कार्यकारिणीत घेण्यात आला. यासोबत आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडे प्रदेश संयोजक या पदाची मोठी जबाबदारी देखील देण्यात आली.अडीच वर्ष महाविकास आघाडी सरकार होते, हे सर्वांनी पाहिले, पण या सरकारमुळे महाराष्ट्राची अडीच वर्ष वाया गेलेली आहेत. अडीच वर्षात सर्वसामान्यांच्या आयुष्यात ते परिवर्तन होऊ शकत होतं, ते परिवर्तन करण्याची ज्यांना संधी मिळाली त्यांनी ती घालवली आहे. त्यांनी फक्त स्वत:च्या जिवनात काय परिवर्तन करता येईल यासाठी प्रयत्न केलेत; मात्र आता राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आली असून, येत्या अडीच वर्षात आपल्याला पाच वर्षाचं काम करायचें आहे, म्हणजेच 20-20 ची मॅच आपल्याला विकासासंदर्भात खेळायची आहे, मुख्यमंत्री आणि आम्ही मिळवून ही मॅच सुरू केली असून बॅटिंग सुरू झालेली आहे आणि 2024 निवडणूक जिंकवूनच आम्ही ही बॅटिंग संपवणार आहे.”
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “जी जबाबदारी मला मिळाली त्या जबाबदारीचा उपयोग करून सामान्य माणसाच्या जिवनामध्ये परिवर्तन घडवायचे हा भाजपचा मूलमंत्र आहे.”पुढे कार्यकर्त्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले की, “आपल्याला चुकीच्या इच्छाशक्तीचा, अनियंत्रीत महत्वाकांक्षाचा आणि सत्तेचं प्रतिनिधीत्व करताना अहंकाराचं त्याग आपल्याला करावा लागेल.””एक विशेष परिस्थितीमध्ये आपले सरकार स्थापन झाले आहे, त्यामुळे आपल्याला आता जनतेचा विचार करावा लागेल, त्यामुळे मला काय मिळणार? हा विचार पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत सोडून द्या,” असे आवाहन फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केले.