मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये पुणे शहराला सर्वोत्तम महानगर तयार करण्याच्या उद्देशाने महानगरपालिका क्षेत्रामध्ये नव्याने समाविष्ट झालेले 23 गावांचा शाश्वत विकास करण्याच्या उद्दिष्टाने पीएमआरडीए चा प्रारूप विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. पुण्यातील पर्यावरण प्रेमी व तज्ञ तसेच पुणेकर नागरिकांनी या विकास आराखड्याचे स्वागत केले आहे. या आराखड्यामध्ये अनधिकृत बांधकामे होणार नाही याची विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. याचेही स्वागत नागरिकांकडून होत आहे. एखाद्या भागाचा विकास करताना पर्यावरणाची हानी होईल, असे कोणतेही धोरण सदरच्या आराखड्यात दिसून येत नाही याची विशेष खबरदारी घेण्यात आल्याचे दिसून येत आहे. नव्याने समाविष्ट झालेला भाग मोठ्या प्रमाणात ग्रामीण भाग असल्यामुळे शेती, वने, वनीकरण, हिल टॉप, ग्रीन बेल्ट, हिल स्लोप याचीही तरतूद करण्यात आली आहे. यामुळे कोणतीही नैसर्गिक आपत्ती (जसे की अतिवृष्टी) आल्यास याभागात त्याचा दुष्परिणाम जाणवणार नाही. तसेच पुणे महानगरपालिकेमधे समाविष्ट करण्यात आलेल्या भागामध्ये 2 रिंग रोड, दहा मेट्रो मार्गिका, हाय स्पीड रेल्वे, इत्यादी वाहतूक नियोजनासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या महानगरांमध्ये वाहतुक समस्या होणार नाही, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. जसे सध्या पुणे शहरामधे असलेली वाहतूक समस्या या नवीन भागात जाणवणार नाही असे योग्य नियोजन केल्याचे दिसून येते. या भागात उद्योग व व्यवसाय निर्मितीसाठी पाच पर्यटन स्थळे, पाच शैक्षणिक केंद्र करण्याचेही प्रस्तावित केले आहे. देशातील पहिले क्रीडा विद्यापीठ हे देखील या प्रस्तावित ठिकाणी होणार असल्यामुळे जागतिक दर्जाचे खेळाडू निर्माण होतील तसेच त्या भागातील स्थानिक नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील, अशा पद्धतीने सर्वसमावेशक व शाश्वत विकास हे धोरण ठेवून मुख्यमंत्री यांनी पीएमआरडीए चा प्रारूप विकास आराखडा मंजूर केलेला आहे. यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विकासाची संकल्पना व दूरदृष्टी तसेच पर्यावरण प्रेम प्रशंसनीय व पुणेकरांना भावणारे आहे. या विकास आराखड्याचे शिवसेना पुणे शहराच्या वतीने तसेच पुण्यातील जागरूक नागरिकांच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांचे शतशः आभार व्यक्त करीत आहोत.
संजय मोरे
(शहरप्रमुख, शिवसेना ,पुणे)