नवी दिल्ली – लोकसभेत भाजपला मिळालेले स्पष्ट बहुमत आणि त्यानंतर भाजप सरकारची मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली वाटचाल एकीकडे पाहत ,दुसरीकडे काँग्रेसच्या दारूण पराभवाबाबत सोनिया आणि राहुल गांधी यांचे आत्मपरीक्षण करणे जवळ जवळ पूर्ण झाले असले तरी आतापर्यंतच्या सरकारच्या कार्कीर्दीवरून आडाखे बांधीत सोनिया आणि राहुल पुन्हा एकदा धर्मनिरपेक्ष पक्षांची जोरदार माळ बांधण्याची तयारी सुरु करतील असा राजकीय समीक्षकांचा व्होरा आहे . तत्पूर्वी इंदिरा गांधी आणि राजीव गांधी या दोघांच्या कारकिर्दीतील त्यांच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेणे गरजेचे आहे असाही त्यांना सल्ला देण्याची गरज समीक्षकांना वाटते आहे
समीक्षकांच्या चर्चेला कारणही तसेच घडले आहे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी रमझाननिमित्त ‘इफ्तार’ची दावत देणार असल्याचे वृत्त आहे भाजपविरोधकांना विशेषत: देशातील सर्व प्रमुख धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्यांना या पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं आहे. १३ जुलै रोजी हि दावत आहे
सोनिया गांधी यांनी स्वत: त्यासाठी पत्रं पाठवली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनियांनी जनता परिवारातील पक्षांसह बहुजन समाज पार्टी, तृणमूल काँग्रेस, डीएमके, अण्णा द्रमुकसह डाव्या पक्षांनाही निमंत्रण दिले आहे. काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांसह राहुल गांधीही या इफ्तारमध्ये सहभागी होणार आहेत.
अनेक नेत्यांनी सोनियांच्या ‘इफ्तार’चे निमंत्रण मिळाल्याचे मान्य केलं आहे. असे समजते मोदी सरकार ने जनतेला ज्या आश्वासनांना बळी पाडले ती पूर्ण न करता अन्य बाबीत जनतेला झुलवत ठेवले आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ची धर्मनिरपेक्ष देश अशी प्रतिमा पुसली जावू लागली तर आपण एकत्र येवून खंबीरपणे उभे राहिलेच पाहिजे असे आवाहन सोनिया यावेळी करतील काय? असा प्रश्न हि विचारला जातो आहे