मुंबई- राज्यातील लॉकडाऊन बाबत ठाकरे सरकारने मध्यममार्ग काढून निर्णय घेतल्याचे सांगत या निर्णयाचे स्वागत विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केले आहे.
प्रविण दरेकर ऑन वीकेंड लॉकडाउन
• पूर्णतः लॉकडाऊन करण्यापेक्षा मध्यममार्ग राज्यसरकारने काढलेला आहे. • अतिशय उत्तम असा निर्णय आहे. • लॉकडाऊन करू नये अशी भावना केवळ भाजप, महाविकास आघाडी सरकारची नव्हती तर सर्वसामान्य जनतेला लॉकडाऊन परवडणार नाही अशा प्रकारची भूमिका सर्व पक्षीय लोकांची होती. • दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी आणि वीकेंडला लॉकडाऊन अशा प्रकारचा मध्यममार्ग निश्चितपणे उत्तम आहे. • जनतेची काळजी आणि आरोग्य व्यवस्थेमध्ये सक्षमपणा करण्याची आवश्यकता राज्यसरकारला आहे. • जे विसंवादाचे विषय आहेत ज्यामुळे खालच्या स्तरावरील लोकांवर अन्याय होतो त्याची काळजी घेणं सरकारला आवश्यकता आहे. • लॉकडाउन पूर्ण झाला असता तर, सर्वसामान्य लोकांची आर्थिक स्थिती विस्कळीत झाली असती. • कोरोनाच्या काळात विरोधकांची भूमिका न घेता एकत्रित या विषयवार मत मांडलं पाहिजे. • महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था कोलमडली असून, राज्यसरकार आरोग्य यंत्रणा वाढवली असल्याचे सांगत असले तरी कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता ऑक्सिजन बेडस, वेंटिलेटरची कमतरता आजही भासत आहे. • वेळेत ऑक्सिजन बेडस, वेंटिलेटर मिळत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रमाण राज्यात वाढू लागले आहे. • वस्तुस्थितीला सामोरं जात व्यवस्था सशक्त करण्याची आवश्यकता आहे. • रुग्णांची परिस्थिति बघता १० हजार रुग्णांना पुरेल एव्हढी सुद्धा आरोग्य व्यवस्था उपलब्ध नाही आहे. • या सर्व गोष्टी गांभीर्याने घेत सर्व गोष्टी तात्काळ नियोजनात आणावी.