पुणे- गेली कित्येक महिने लसींचा पुरवठा पुरेपूर होता असताना लसींचा साथ वाढत असताना तो केंद्रांवरून माघारी जात होता लसींचे डोस शिल्लक पडून राहिले . महापालिकेने केंद्रे बंद केली पण लसींचे तिसरे डोस ,बूस्टर डोस देण्याचा साधा विचारही केला नाही . ना केंद्राकडे परवानगी मागितली ना राज्याकडे , ना स्वतःच्या पातळीवर पुनावालांशी बोलून यासाठी प्रयत्न केले . असा ठपका आता पुणे महापालिका आणि पालकमंत्री यांच्यावरही ठेवला जाऊ शकणार आहे.
कोरोना चे रुग्ण पुन्हा वाढू लागले याचा अर्थ काय ? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय अशाच भोंगळ पद्धतीने कारभार गेली २ वर्षाहून अधिक काल सुरु आहे आणि सुरु राहिला तर मध्यमवर्गीय अस्तित्वात राहील काय ? असा प्रश्न आता विचारला जातोय . पुन्हा पुन्हा तेच तेच होत असेल तर एकटे लोक याला जबाबदार म्हणून प्रशासन आपले अंग काढून घेऊ शकणार नाही . तिसरा बुस्त्र डोस का दिला नाही अजूनही त्याचा विचार का होत नाही ? याची उत्तरे आता मान्यवरांना द्यावी लागणार आहेत . करोना , ओमायक्रोन अशा महामारींच्या नावाखाली आणि दहशतीखाली बंधने किती काल , किती वर्षे लादणार ? आणि लोकही ती किती वर्षे सहन करणार ? असे हि प्रश्न आता आ वासून पुढे उभे आहेत .