नवी दिल्ली- आपल्याला दुसऱ्या एका राक्षसाविरोधात एकत्र आले पाहिजे आणि तो आहे घराणेशाहीचा राक्षस. ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे आणि जे देशाच्या प्रगतीसाठी काम करतील त्यांना आपण संधी दिली पाहिजे. गुणवत्ता हाच नव्या भारताचा आधार असेल असे सांगत येणारे युग डिजिटल युग आहे या युगात भारत सामर्थ्यशाली देश बनवू या असे आवाहन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले.
भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होतो आहे. आज 15 ऑगस्ट 2022, यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळत आहे. देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. पंतप्रधान मोदी यांनी नवव्यांदा ध्वजारोहण केलं आहे. यानंतर त्यांनी देशातील जनतेला संबोधित करत देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्या दिल्या. 1)घराणेशाहीमुळे राजकीय क्षेत्राचे नुकसान झाले आहे. घराणेशाही नष्ट करायला हवी.असे सांगत पुढच्या 25 वर्षासाठी नरेंद्र मोदी यांनी 5 संकल्प ठेवले आहेत. याला पंचप्राण असंही म्हंटल आहे. पुढील 25 वर्षात विकसित भारत हा सर्वात पाहिला संकल्प आणि महत्त्वाचा संकल्प. 2) गुलामीच्या मानसिकतेचा अंशही राहणार नाही हा नरेंद्र मोदी यांचा दूसरा संकल्प आहे. 3) देशाच्या समृद्ध वारशाचा सर्वजण अभिमान बाळगतील हा तिसरा संकल्प आहे. 4) देशवासीयांची एकता आणि एकजूट हा चौथा संकल्प आहे. 5) नागरिकांकडून कर्तव्याचं पालन हा पाचवा संकल्प पंतप्रधान मोदी यांनी सांगितला आहे. 6) आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशीचा संकल्पाही त्यांनी मांडला आहे. 7) 75 वर्षांमध्ये पहिल्यांदा स्वदेशी तोफांची सलामी भारताच्या राष्ट्रध्वजाला दिली गेली तसेच ऊर्जा क्षेत्रात देश स्वावलंबी बनेल असं ध्येय पंतप्रधान मोदी यांनी समोर ठेवलं आहे. 8) नवीन शैक्षणिक धोरण गुलामीची मानसिकता दुर करेल त्यामुळे शैक्षणिक धोरणात वृद्धी आणण्याच लक्ष मोदीं यांनी समोर ठेवलं आहे. 9) ‘जय जवान, जवान किसान, जय विज्ञान, जय अनुसंधान’, असा नाराही त्यांनी आपल्या भाषणातून दिला आहे. 10) येणार युग हे डिजिटल असणार आहे, त्यात भारतही शक्तिशाली बनेल या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत असंही मोदी यांनी सांगितल आहे
देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदीन मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतील लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करून देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी देशातील भ्रष्टाचार आणि घराणेशाहीवर प्रहार करत त्यांना समूळ नष्ट करावे लागेल असे मत व्यक्त केले. तसेच भ्रष्टाचारविरोधी लढाई लढण्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. मागील सरकारच्या काळात जे लोक बँकांना लुटून देश सोडून गेले आहेत, त्यांची सपत्ती जप्त करून त्यांना भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहितीदेखील नरेंद्र मोदी यांनी दिली.“भारतात काही लोक गरिबीशी लढत आहेत. काही लोकांकडे राहण्यासाठी घर नाही. तर दुसरीकडे काही लोकांकडे चोरी केलेला माल लपवण्यासाठी जागा नाही. हे योग्य नाही. याच कारणामुळे आपल्याला भ्रष्टाचाराविरोधात लढायचे आहे. आधारकार्ड, मोबाईल या आधुनिक साधनांचा वापर करून चुकीच्या लोकांच्या हातात जाणारे २ लाख कोटी रुपये वाचवण्यात आम्हाला यश आले. मागील सरकारमध्ये जे लोक बँकांना लुटून पळून गेले, त्यांची संपत्ती जप्त करून त्यांना परत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. काही लोकांना तुरुंगात डांबलं आहे. ज्या लोकांनी देशाला लुटले आहे, त्यांना ते परत करावे लागेल, अशी स्थिती आम्ही निर्माण करत आहोत,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.“आपण एका निर्णायक कालखंडात प्रवेश करत आहोत. मी लाल किल्ल्यावरून मोठ्या जबाबदारीने बोलत आहे. मला भ्रष्टाचाराच्या लढाईला गती द्यायची आहे. त्यासाठी तुमची साथ हवी आहे. मला आशीर्वाद द्या. ही लढाई लढण्यासाठी मला तुमची मदत लागणार आहे. मला सामान्य लोकांचे जगणे सुकर करायचे आहे. कधीकधी भ्रष्टाचाऱ्यांविरोधात उदारता दाखवली जाते. कोणत्याही देशाला भुषणावह नाही. काही ठिकाणी तर कोर्टाने शिक्षा सुनावलेली असली तरी, भ्रष्टाचारी असल्याचे सिद्ध झाले असले तरी त्यांचे महिमामंडन केले जाते. त्यांना प्रतिष्ठा दिली जाते. जोपर्यंत भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचाऱ्यांविरोधात चीड निर्माण होणार नाही, तोपर्यंत भ्रष्टाचार कमी होणार नाही,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.“घराणेशाही हादेखील एक मुद्दा आहे. राजकीय घराणेशाहीमुळे भारतातील प्रत्येक संस्थेमध्ये घराणेशाहीला पोषण दिले जात आहे. याच कारणामुळे माझ्या देशाचे सामर्थ्य, बुद्धीमत्तेला नुकसान पोहोचत आहे. घराणेशाहीमुळे गुणवत्तेला वाव मिळत नाही. घराणेशाही, परिवारवाद हादेखील भ्रष्टाचारास कारणीभूत ठरतोय. घराणेशाहीविरोधात आपल्याला जागरुकता निर्माण करावी लागेल. संस्थांना वाचवायचे असेल तर आपल्याला हे करावे लागेल,” असे म्हणत मोदी यांनी घराणेशाहीला विरोध दर्शवला.“राजकारणातही परिवारवाद संपवायला हवा. घराणेशाहीच्या राजकारणाला देशाशी काही देणघेणं नसतं. याच कारणामुळे देशातील राजकारण शुद्धीसाठी घराणेशाहीच्या मानसिकतेला दूर करून गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे आवाहन करतो. घराणेशाहीविरोधातील लढाईसाठी मला तुमची साथ हवी आहे,” असे मोदी देशातील जनतेला उद्देशून म्हणाले.