https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1579924778837821/
मुंबई- महाराष्ट्राचे नवनिर्नाचीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारची बहुमत चाचणी आज पार पडली. विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या बाजूने 169 मत पडली, तर 4 आमदार तटस्थ राहिले.यावेळी भाजपने नियमबाह्य अधिवेशन बोलवल्याचा आरोप करत, सभात्याग केला.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी हा विश्वासदर्शक ठराव मांडला. त्याला नवाब मलिक, सुनिल प्रभू, जयंत पाटील या तिन्ही नेत्यांनी अनुमोदन केले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी ज्यांचा मंत्रिमंडळावर यांनी ज्यांचा पाठिंबा आहे. त्यांनी एका बाजूला बसण्याचे आदेश दिले.
विधानसभेत अधिवेशनाला आणि बहुमत चाचणीला उपस्थित राहण्यासाठी सर्व पक्षांनी
आपाल्या आमदारांना व्हीप जारी केला होता. विधानसभेचे कामकाज दुपारी 2 वाजता सुरू झाले. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सरकारच्या कामकाजावर बोट ठेवले. यावेळी त्यांनी अधिवेशन नियमबाह्य असल्याचे सांगितले.
“हे अधिवेशन नियमबाह्य असून, 27 नोव्हेंबरला राष्ट्रगीत झाले म्हणजे अधिवेशन संस्थगित झाले. अधिवेशन पुन्हा बोलावण्यासाठी राज्यपालांच्या समन्सची गरज असते, असे झाले नाही.” असे मत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. तसेच नव्या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम ने व्हायला हवी होती. असेही ते म्हणाले. याववर उत्तर देताना विधानसभा हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील म्हणाले की, राज्यपालांच्या समन्सनेच हे अधिवेशन बोलावले आहे. हे अधिवेशन पूर्णपणे कायदेशीर आहे, तुमचा मुद्दा मी फेटाळून लावतो. तसेच, पुढे बोलताना ते म्हणाले की, सात दिवसाच्या आत सभागृह बोलवता येते. शपथविधी झाल्यानंतर बैठक झाली त्यानंतर काल राज्यपालांनी परवानगी दिली. त्यामुळे हे अधिवेशन कायदेशीर आहे. तुमचा मुद्दा फेटाळून लावतो. अशा पध्दतीने दिलीप वळसे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं.
दुसरीकडे, अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून नाना पटोले आणि भाजपकडेनकिसन कठोरे आहेत. यासाठी रविवारी म्हणजेच उद्या मतदान होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं सिद्ध केलं : सभागृहात बहुमत, ठरावाच्या बाजूने 169, तर ठरावाच्या विरोधात शून्य मतदान, चार जण तटस्थ (मनसे 01, एम आय एम 02, माकप 01)
(भाजपच्या सदस्यांनी सभात्याग केला)
*तस बघितलं तर 170 आमदारांच संख्याबळ सत्ताधारी पक्षाकडे आहेत,
*शिवसेना 56, राष्ट्रवादी 54 (वळसे पाटील वगळून 53), काँग्रेस 44 आणि अन्य 16*
*सत्ताधारी* – 56+53+44+16 = 169
*तटस्थ* – मनसे 01, एम आय एम 02, माकप 01 = 4
*विरोधी मतदान -* 0
*भाजपा आणि अन्य* – भाजप 105 आणि अन्य 9 = 114 (पण ते सभात्याग केला आहे)