मुंबई-राज ठाकरे यांनी 3 मे रोजी ईद असल्यामुळे भोंग्यांना हात लावणार नाही मात्र 4 मेला ऐकणार नसल्याचा इशारा दिलेला आहे. राज ठाकरे यांची ही भूमिका संविधान विरोधी असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्ष मशिदींवरील भोंग्यांचे संरक्षण करील. पोलिसांनी सुद्धा रिपब्लिकन कार्यकर्त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. राज ठाकरे यांनी ईशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजातील काही व्यक्ती भडकाऊ उत्तर देऊन अधिक तेढ निर्माण होईल, अशी भूमिका कोणीही घेऊ नये असे आवाहनही रामदास आठवले यांनी केले आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीच्या मोठ्या जाहीर सभा नुकत्याच पार पडल्या. निवडणुकीसाठी सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करीत असताना आता केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षही अॅक्टिव्ह मोड मध्ये आला आहे.उद्या 4 मे रोजी मशिदीवरील भोंगे कोणी जबरदस्ती उतरविण्यासाठी पुढे येतील तर त्यांना रोखण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक पुढे उभे राहतील. संविधानाचे राज्य असून इथे कुणाचे दादागिरी आम्ही चालू देणार नाही, असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. तसेच, रिपब्लिकन कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आवाहनही केले आहे.