नवी दिल्ली – आज देशातील एकूण सक्रिय रूग्णांच्या संख्येने 10 लाखाचा (10,09,976) टप्पा ओलांडला आहे.भारतात गेल्या दोन दिवसांत कोवीड -19 चा संसर्ग झालेले रूग्ण मोठ्या संख्येने बरे झाल्याचे दिसून आले आहे. या दोन दिवसांत तब्बल 82,000 पेक्षा जास्त रूग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. गेल्या 24 तासात 82,961 सक्रिय रूग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले आहेत.
बरे झालेल्या रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे बरे होणाऱ्या रूग्णांच्या राष्ट्रीय सरासरीतही वाढ होऊन ती 78.64% इतकी झाली आहे.
बरे झालेल्या एकूण रूग्णांपैकी एक पंचमांश पेक्षा जास्त अर्थात 17,559 (21.22%) रूग्ण महाराष्ट्रातील असून त्याखालोखाल आंध्र प्रदेशमधले 10,845, कर्नाटकमधले 6580, उत्तर प्रदेशमधले 6476 आणि तमीळनाडूमधले 5768 असे 35.87% रूग्ण बरे झाले आहेत.
या सर्व राज्यांमधले एकूण 57.1% रूग्ण बरे झाले आहेत.
यातील सुमारे निम्मे (48.45%) सक्रिय रूग्ण महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांमध्ये आहेत. तर या राज्यांबरोबरच उत्तर प्रदेश आणि तमीळनाडू, अशा पाच राज्यांमध्ये सुमारे 60% सक्रिय रूग्ण आहेत.
आतापर्यंत एकूण 40 लाखापेक्षा जास्त (40,25,079) रूग्ण बरे झाले आहेत. सक्रिय रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रूग्णांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त (30,15,103) असून चार पटीने जास्त आहे. देशभरात गेल्या 24 तासात कोरोना संसर्गामुळे 1132 जण दगावले आहेत. यात महाराष्ट्रातील 474 जणांचा समावेश असून दगावलेल्या एकूण रूग्णांपैकी 40% पेक्षा जास्त रूग्ण महाराष्ट्रातील आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेश (86), पंजाब (78), आंध्र प्रदेश (64) आणि पश्चिम बंगाल (61) अशा चार राज्यांमधील 25.5% रूग्ण गेल्या 24 तासांत दगावले आहेत.