पुणे- पुण्याच्या आणि आसपासच्या अनेकांच्या घरातील कर्त्या माणसांच्या नौकऱ्या गेल्यात ,असंख्य कुटुंबे बेरोजगारीच्या खाईत कोरोना मुळे सापडलीत,आरोग्याची होणारी प्रचंड हेळसांड आणि त्यामुळे खर्चाच्या वादळाने हैराण झालेली आणि दुसरीकडे दारात पुराची भीती आणि घरात प्यायला पाण्याची कमतरता,रस्त्यांची दुरावस्था ,अतिक्रमण कारवाया अशा विविध मार्गांनी जनतेच्या हालअपेष्टा वाढतच चालल्या आहेत . अशा जनतेशी थेट संबधित असलेल्या प्रश्नावरून महापालिकेच्या मुख्य सभेत सत्ताधारी भाजपा आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांना धारेवर धारा ,त्यांना उघडे पाडावे असा निर्धार काल महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक आणि कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांच्या दालनात शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आला . सत्ताधारी शासन आदेशाचा मनाप्रमाणे अर्थ लावून ,आणि आदेश न जुमानता मुख्य सभा गुंडाळून टाकीत आहेत हे जनतेला समजले पाहिजे . अशा पद्धतीने वेळप्रसंगी सभागृहात कामकाज व्हावे ,असे यावेळी ठरविण्यात आले. बऱ्याच वर्षांनंतर काँग्रेसच्या नगरसेवकांची काल महापालिकेत बैठक झाली. यावेळी शहराच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा झाली.
यावेळी पुणे शहर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेस पक्षाचे पुणे महानगरपालिकेचे गटनेते आबा बागुल, नगरसेवक अरविंद शिंदे,अविनाश बागवे,रविंद्र धगेकर, नगरसेवक रफिक शेख, नगरसेविका सुजाता शेट्टी, वैशाली मराठे, चाँदबी नदाफ, स्वीकृत नगरसेवक अजित दरेकर आदी उपस्थित होते.बऱ्याच वर्षानंतर महापालिका काँग्रेस पक्षाची बैठक सोमवारी गटनेते आबा बागुल यांच्या दालनात झाली. पुणेकरांपुढील असलेले प्रश्न, महापालिकेचा कारभार यावर बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली, असे आबा बागुल यांनी सांगितले.
महापालिकेचा कारभार, सभांपुढील कार्यपत्रिका यावर पक्षाची बैठक घेऊन निर्णय आखणे, व्यूहरचना ठरविणे अशी पद्धत माजी खासदार सुरेश कलमाडी यांनी अवलंबिली होती तीच पद्धत आबा बागुल यांनी पुन्हा चालू केली आहे. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.पुणेकरांना चांगल्या आरोग्याच्या सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे, त्यासाठी आवाज उठविण्याचे आदेश रमेश बागवे यांनी नगरसेवकांना दिले आहेत. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते.