मुंबई. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर पूर्ण देशभरात बॉलीवूडच्या गटबाजीची चर्चा सुरू आहे. बॉलीवूडमध्ये असलेला वर्चस्ववाद आणि गटबाजीमुळे सुशांतने आत्महत्या केली, असे सर्वांना वाटू लागले आहे. मात्र अजून त्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले नाही.
दिग्दर्शक शेखर कपूर यांच्या ‘पानी’ चित्रपटानंतर झाली वादाला सुरुवात
इंडस्ट्रीमध्ये मोठे पंडित मानले जाणारे यशराज, साजिद नाडियादवाला आणि धर्मा यांनी टॅलेंट मॅनेजमेंटची सुरुवात केली आहे. ते ज्यांना लाँच करतात त्यांच्यासोबत तीन चित्रपटांचा करार होतो. त्यानंतर कलाकार कोणत्याही नवीन बॅनरसोबत काम करू शकत नाही. हा करार लिखित स्वरूपात असताे. याचा उद्देश क्षमता असलेल्या कलाकाराला आपल्यापर्यंत मर्यादित ठेवणे हा आहे. यासाठी रणवीरसिंह, अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि अनुष्का शर्मासारखे मोठे कलाकार येतात. ज्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ही यशराजसोबत केली. यशराजने सुशांतसोबतही तीन चित्रपटांचा करार केला होता. यामध्ये‘ब्योमकेश बक्शी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि शेखर कपूरच्या ‘पानी’चा समावेश होता. या पूर्ण प्रकरणात पानी या चित्रपटापासून गडबड सुरू झाली. शेखर कपूर सुरुवातीला हा चित्रपट हॉलीवूडसाठी बनवत होते. नंतर भारतात बनवण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाचे बजेट वाढत गेले आणि शेवटी यशराज यांच्याकडून हात काढून घेण्यात आले. येथेच सुशांत आणि यशराज यांचे संबंध बिघडले.