नवी दिल्ली-
भाजप आमदार नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन देण्याचा अर्ज फेटाळला आहे. तसेच जिल्हा सत्र न्यायालयासमोर शरण येण्यास 10 दिवसांचा कालावधी सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. सुप्रीम कोर्टाने हि आता जामीन अर्ज फेटाळून लावला आहे .शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला प्रकरणी नितेश राणे यांचा जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांच्या वकीलाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर अखेर नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. आज सुप्रीम कोर्टात त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. त्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर आहे..
काय आहे प्रकरण?
18 डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे.