औरंगाबाद-आनंद ज्ञानदेव कस्तुरे नामक एका सामाजिक कार्यकर्त्याने औरंगाबाद मधील क्रांती चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ‘शिंदेंनी 31 जुलै रोजी रात्री 10 वाजेनंतर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर लाऊडस्पीकरवरुन भाषण करून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले. तसेच या ठिकाणी बेकायदेशीर जमावही उपस्थित होता. त्यामुळे पोलिसांनी मुख्यमंत्री शिंदे व या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करावा,’ अशी मागणी कस्तुरे यांनी आपल्या तक्रार अर्जाद्वारे केली आहे. पोलिसांनी हा अर्ज स्वीकारला आहे. पण तूर्त त्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.