शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद सभेच्या आयोजकांसह सहा जणांना अटक करण्यात आल्याने खळबळ
पुणे : शिवसेनेतील बंडखोर आमदार उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत काल पुणे दौऱ्यावर असताना कात्रज भागात त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आयोजक आरोपींना ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीमध्ये शिवसेना शहरप्रमुखाचा सामावेश आहे.तसेच कात्रज भागातील वकील संभाजी थोरवे यांचाही समावेश असल्याने या प्रकरणी खळबळ उडाली आहे.सामंत यांच्या गाडीवर झालेला हल्ला हि प्रत्यक्षात घडलेली घटना आणि अटक आरोपी यातील महत्वाचे साक्षीदार आमदार उदय सामंत यांनी आरोपींची ओळख परेड केली किंवा कसे हे समजू शकलेले नाही , उदय सामंत शिवसेनेचे मंत्री होते आणि शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे व थोरवे यांच्यासह ते यात अटक केलेल्या आरोपींना ओळखत असावेत असे पोलिसांना वाटले नाही काय ? यामुळे सामंत आणि आरोपी यांच्यात अटक करण्यापूर्वी ओळखपरेड करणे गरजेचे नव्हते काय ? असे सवाल उपस्थित होत हि खळबळ उडाली आहे ज्यामुळे पोलिसी कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
विराज सावंत (Viraj Sawant) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी भादवि 307, 353, 332, 109, 143, 147, 148, 149, 427, 504, 506, महाराष्ट्र पोलीस अॅक्टनुसार गुन्हा (FIR) दाखल केला व आरोपींना पुणे सत्र न्यायालयात (Pune Sessions Court) हजर केले
पोलिसांनी नेमके कशाच्या आधारावर अटक केली ?
आरोपीतर्फे बाजू मांडताना अॅड. विजयसिंह ठोंबरे (Adv.Vijay Singh Thombre) यांनी सदरचा गुन्हा हा खोटा व बनावट असून आमदार सामंत यांच्या गाडीवर हल्ला झाल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाला असून त्यामध्ये एकही शिवसेना पदाधिकारी सहभागी असल्याचे दिसून येत नाही. तरीसुद्धा केवळ सर्वजण शिवसेनेचे पदाधिकारी व शहराध्यक्ष असल्याने त्यांच्यावर राजकीय दबावापोटी खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. या आरोपीविरुद्ध कलम 307 लागू होत नाही तसेच कलम 353 चा प्रश्नच येत नाही. फिर्यादी हा सरकारी कर्मचारी नाही. आरोपी क्रमांक 6 बबनराव नारायण थोरात हे मूळचे हिंगोलीचे शिवसेना संपर्कप्रमुख असून घटनास्थळावर ते उपस्थित नव्हते. त्यांना मुंबई येथून अटक करण्यात आली आहे. यावरून गुन्हा हा राजकीय आकसापोटी या आरोपींवर दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींकडून कोणत्याही प्रकारची रिकव्हरी बाकी नाही त्यामुळे सदर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी केला.तसेच सदर रिमांड वेळी अॅड. मयूर लोढा (Adv. Mayur Lodha) व अॅड. अतुल पाटील (Adv. Atul Patil) यांनी देखील युक्तिवाद केला. सरकारी वकील वर्षाराणी जाधव (Public Prosecutor Varsarani Jadhav) यांनी 8 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडी सुनावली. सदर प्रकरणातील आरोपींस पुन्हा 6 ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करणार आहेत.