मुंबई – ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांच्या निधनाने भारतीय चित्रपट सृष्टीतील कसदार अभिनेते; विचारवंत ;लेखक ; नाटककार ; साहित्य आणि अभिनय कलेचा संगम असणारे समृद्ध संपन्न व्यक्तीमत्व हरपले आहे आशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत गिरीश कर्नाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
दिवंगत गिरीश कर्नाड हे वास्तववादी विचारवंत होते.साहित्यिक लेखक म्हणून तसेच अभिनेते दिग्दर्शक म्हणून ही त्यांनी खूप भरीव कामगिरी केली आहे. मानवतावादी समतावादी विचार त्यांनी आपल्या लेखणीतून मांडले. त्यांच्या कलाकृतीतून भारतीय सिनेमा आणि साहित्य क्षेत्र समृद्ध करण्याचा त्यांचा कायम प्रयत्न होता. त्यांचा अभिनय सिनेरसिकांच्या मनात कायम घर करून आहे. चरित्र अभिनेता म्हणून त्यांनी आपला ठसा उमटविला आहे.गिरीश कर्नाड यांना पद्मश्री ; पद्मभूषण किताबाने गौरविण्यात आले होते.तसेच ज्ञानपीठ पुरस्कार आदी अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.त्यांच्या निधनाने चित्रपट सृष्टी आणि साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशी शोकभवना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.