नवी दिल्ली – रमेश बैस यांची महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांनी याआधी झारखंड आणि त्रिपुराचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. तसेच वाजपेयी सरकारच्या काळात त्यांनी मंत्रिपदही सांभाळले होते.राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशातील १३ राज्यापालांची नियुक्ती केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.बैस यांचा जन्म मध्य प्रदेशातील रायपूरमध्ये झाला आहे. आता रायपूर छत्तीसगडमध्ये आहे. मध्य प्रदेश भाजपचे ते उपाध्यक्ष होते.सलग सात वेळा ते खासदार म्हणून निवडून आले. १९९९ पासून अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते.
नगरसेवक-केंद्रीय मंत्री ते राज्यपाल पदापर्यंतचा प्रवास
- रमेश बैस यांचा जन्म 2 ऑगस्ट 1947 रोजी झाला. 1978 मध्ये ते पहिल्यांदा रायपूर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून निवडून आले.
- 1980 ते 1984 या काळात रमेश बैस हे अविभाजित मध्य प्रदेश विधानसभेचे सदस्य राहिले आहेत.
- 1982 ते 1988 या काळात रमेश बैस यांनी मध्य प्रदेशचे राज्यमंत्री म्हणूनही काम केले.
- 1989 मध्ये रमेश बैस पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत उतरले, जिथे रमेश बैस यांनी विजय मिळवला आणि संसदेत आपले स्थान निर्माण केले.
- छत्तीसगड-मध्य प्रदेशच्या विभाजनानंतर रमेश बैस हे रायपूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले.
पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात रमेश बैस यांनी देशाचे केंद्रीय मंत्री म्हणूनही अनेक खाती सांभाळली आहेत, ती पुढीलप्रमाणे:
- मार्च 1998-ऑक्टोबर 1999 पोलाद आणि खाण राज्यमंत्री
- ऑक्टोबर 1999-सप्टेंबर 2000 रासायनिक खते राज्यमंत्री
- सप्टेंबर 2000-जानेवारी 2003 माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री
- जानेवारी 2003-जानेवारी 2004 खाण मंत्रालय
- जानेवारी 2004-मे 2004 पर्यावरण आणि वन मंत्रालय
लोकसभा निवडणुकीत रमेश बैस चार वेळा नशीब आजमावले असून, त्यात ते तीनदा विजयी झाले आहेत. यानंतर त्यांना 2019 मध्ये त्रिपुराचे राज्यपाल बनवण्यात आले. 2021 मध्ये त्यांची झारखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्या नंतर आता ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभळणार आहेत.