औरंगाबाद –
चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी मनसे प्रमुख राज ठाकरेंवर औरंगाबदेतील सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबादेत मनसेची सभा झाली या सभेत 16 पैकी 12 अटींचे उल्लंघन राज ठाकरे आणि आयोजकांनी केले असा आरोपही ठेवण्यात आला आहे.औरंगाबादेत गुन्हा दाखल झाल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलावली आहे. गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर आणि चार मे रोजी दिलेल्या अल्टीमेटवर चर्चा यात होणार असून उद्या राज्यभरात मनसे रस्त्यावर उतरण्याची शक्यता लक्षात घेता यावरही बैठकीत दिशा ठरणार आहे.औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या भाषणाचा आणि नियमभंग केल्याबाबतचा अहवाल गृहखात्याकडे पाठवला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी या अहवालाचा अभ्यास केल्यानंतर तो मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या बैठकीत ठेवण्यात आला. या अहवालाचा आढाव घेतल्यानंतर राज ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.या प्रकरणात सिटीचौक पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक गजानान इंगळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. त्यानुसार कलम 116, 117, 153 भारतीय दंड विधान 1973 सह कलम 135 महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 सुधारीत 31 जुलै 2017 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.