मुंबई. भारतीय जनता पार्टी, मुंबईचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढ़ा ह्यांनी मुंबईला 31 मार्चपर्यंत पूर्णत: लॉक्ड डाउन करण्याची मागणी केली आहे. पूर्णत: लॉक्ड डाउन केल्याशिवाय कोरोनावर नियंत्रण मिळवणे सोपे नाही, अशी मागणी त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे. कारण मागच्या दोन महिन्यांपासून जेव्हापासून कोरोना व्हायरस पसरण्याच्या बातम्या आहेत, तेव्हापासून व्हायरस पसरलेल्या देशांमधून हजारो लोक मुंबईमध्ये आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जनता कर्फ्यूचे आवाहन योग्य असून सर्वांच्या हिताचे आहे असे सांगितले आहे आणि 22 मार्चला सर्वांनी त्यात सहभाग घ्यावा, असे भाजपा अध्यक्ष लोढ़ा ह्यांनी म्हंटले आहे.
भाजपा अध्यक्ष लोढ़ा ह्यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे की, ज्या देशांनी हळु हळु लॉक्ड डाउन केले, तिथे कोरोना जास्त पसरला आहे. त्याउलट चीनने एकदम सर्व बंद केले तर तिथे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. त्यांनी म्हंटले की, पूर्ण लॉक्ड डाउनमुळे निश्चितपणे छोटे व्यापारी व दैनंदिन रोजगार करणारे लोक, मजूर व कामगारांना अडचण होईल आणि लोकांना त्रासही होईल. पण जीवन सुरक्षित राहण्यासाठी मुंबईला पूर्ण लॉक्ड डाउन करण्याची गरज आहे. सध्याच्या अतिशय जोखमीच्या परिस्थितीमध्ये आपण सर्वांना दीर्घ काळ अतिशय निर्बंधयुक्त जीवन जगणे गरजेचे होऊ शकते व आपण त्यासाठी तयार राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे. आरोग्य कर्मचारी, सुरक्षा दल, पोलिस व अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या सर्व लोकांना पंतप्रधान मोदींच्या सूचनेप्रमाणे 22 मार्चला सायंकाळी 5 वाजता जनतेने धन्यवाद देण्याचे आवाहन केले आहे. भाजपा अध्यक्ष लोढ़ा ह्यांनी ह्या संदर्भात महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून म्हंटले आहे की, जनतेच्या हिताच्या दृष्टीने ह्या मागणीवर तत्काळ लक्ष देऊन अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईला 31 मार्चपर्यंत पूर्णत: लॉक्ड डाउन केले जावे. कारण महाराष्ट्र व मुंबई महानगर परिसरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. पूर्ण लॉक्ड डाउन करूनच कोरोनावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते.