- नरेंद्र मोदींनी शुक्रवारी सर्वपक्षीय बैठकीत म्हटले होते- भारतीय सीमेत घुसखोरी झालीच नाही
- विरोधकांनी विचारले- घुसखोरी झाली नाही, तर मग मारामारीत आपले 20 जवान शहीद का झाले ?
नवी दिल्ली. चीनच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यानंतर वाद सुरू झाल्यावर पंतप्रधान ऑफिस (पीएमओ) ने शनिवारी स्पष्टीकरण दिले आहे. पीएमओने म्हटले की, नरेंद्र मोदींच्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर करुन, वाद निर्माम केला जात आहे.
पंतप्रधान काय म्हणाले होते ?
शुक्रवारी झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत मोदी म्हणाले होते की, ‘लड्डाखच्या सीमेत कोणतीच घुसखोरी झाली नाही आणि आपल्या पोस्टवरही कोणी कब्जा केला नाही.’
विरोधकांनी काय म्हटले ?
काँग्रेस नेते पी चिदंबरम म्हणाले की- पंतप्रधानांचे हे विधान खरे आहे, तर मग भारताचे 20 जवान शहीद कसे झाले ? दोन्ही देशात चर्चा का होत आहेत ? दुसरीकडे, राहुल गांधींनी अशाच प्रकारचे प्रश्न विचारले. त्यांनी हेदेखील म्हटले की, पंतप्रधानांनी चीनच्या हल्ल्यापुढे सरेंडर केले आहे.
पीएमओचे स्पष्टीकरण
सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधानांनी 15 जूनच्या मारामारीचा रेफरेंस दिला होता. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता की, सैनिकांच्या शौर्यामुळे भारताच्या सीमेत कोणीच घुसले नाही. आपल्या सैनिकांनी प्राण देऊन चीनी सैनिकांना हुसकून लावले.
“सर्वपक्षीय बैठकीत ही माहिती देण्यात आली होती की, यावेळी प्रत्यक्ष सीमा रेषेजवळ चिनी सैन्य पूर्वीपेक्षा अधिक संख्येनं आलं होतं. १५ जून रोजी चिनी सैन्याकडून प्रत्यक्ष सीमा रेषेजवळ भारतीय हद्दीत बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला. हे काम रोखण्यास चिनी सैन्यानं नकार दिला होता. त्यामुळे संघर्ष उफाळून आला. पंतप्रधानांनी केलेलं विधान १५ जून रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षाशी संबंधित होतं. ज्यात २० जवान शहीद झाले होते,” असं पंतप्रधान कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.
“पराक्रमी जवान देशाच्या सीमांचा रक्षण करत असताना त्यांचं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी अनावश्यक वाद उभा केला जात आहे, है दुर्दैवी आहे. पंतप्रधानांनी केलेल्या विधानांवर उपस्थित करण्यात आलेले प्रश्न हा प्रोपोगंडा असून, यामुळे भारतीयांची एकत्मता कमी होणार नाही,” असं पीएमओ कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.