ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त भाजप अध्यक्षांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली
मुंबई: भारत छोडो आंदोलनाच्या ७७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबई भाजपाध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईमधील ऑगस्ट क्रांती मैदान येथे जाऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पित करून शहिदांचे स्मरण केले. ९ ऑगस्ट १९४२ साली भारतीय स्वतंत्र चळवळीच्या शेवटच्या टप्प्यात मुंबईत याच मैदानातून महात्मा गांधी यांनी ‘भारत छोडो’ हा नारा दिला. याप्रसंगी मलबार हिलचे आमदार लोढा म्हणाले की, ऑगस्ट क्रांती मैदान सारख्या राष्ट्रीय महत्त्वाच्या क्षेत्रातून ते आमदार असल्याचा त्यांना गर्व आहे.
ऑगस्ट क्रांती नावाने प्रसिद्ध असलेल्या या मैदानात इंग्रजांच्या विरुद्ध आंदोलनाची सुरुवात केली असल्याने, या घटनेचे स्मरण करून दरवर्षी ९ ऑगस्ट रोजी शहिदांना श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात ९ ऑगस्ट या दिवस ‘भारत छोडो आंदोलन’ म्हणून नोंदविला गेला आहे. शुक्रवारी याच क्रांतिकारी घटनेचा ७७ वा वर्धापन दिवस होता. काल संक्रांति स्थळी श्रद्धासुमन कार्यक्रमात मुंबई अध्यक्ष लोढा यांच्यासह दक्षिण मुंबईचे जिल्हाध्यक्ष शरद चिंतन सहित भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.