पुणे – काश्मिरी लोकांना राज्यघटनेतील 35 A व्या कलमाने मिळालेले संविधानिक संरक्षण काढून टाकण्याच्या गोष्टी सुरू आहेत. याचे देशाला गंभीर परिणाम भोगावे लागतील. काश्मिरातील सैन्य आहे. तो पर्यंत तेथील जनता शांत राहिल. सैन्य मागे घेतल्यावर अथवा लढण्याची ताकद मिळताच जनता पुन्हा सैन्यासोबत लढेल. हा भारतीय जवान शहिद जवानाला शहिद करण्याचा सरकारचा डाव आहे. पोकळ राष्ट्रवादाची भूमिका सरकार मांडत आहे. याचे गंभीर परिणाम आपल्या देशाला भोगावे लागतील. असा इशारा डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी दिला. सरकारने काश्मिरी जनतेसोबत चर्चा करावी. असा सल्ला केंद्रसरकारला दिला. लोकांनी मतदान करून पंतप्रधानपदी बसवलं म्हणजे देशाचे नाही. म्हणून यावर निर्णय घेऊ शकत नाही. देशातील जनतेला विश्वासात घेऊनच हा प्रश्न सोडवावा लागेल. अशी टीका आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केली. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.
श्रीनगर शहर भीतीच्या छत्रछायेखाली
काश्मिर प्रश्नावर सरकार घेत असलेल्या भूमिकेविरोधात जागोजागी मोर्चे आंदोलने करतील.
काश्मीर मधील स्थानिक राजकीय पक्ष व तेथील जनता सरकार विरोधात आहे. काश्मीर मधील लडाख प्रांतातील लामा भितीच्या छत्रछायेखाली आहेत. नेहमी सरकार सोबत असणारे श्रीनगर शहर भितीच्या छायेत आहे. काश्मिरमध्ये कोणतीही कारवाई करण्याअगोदर सरकारने विरोधी पक्षांना विश्वासात घ्यायला हवे.