दिल्लीः करोना व्हायरसचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे विद्यापीठ परीक्षा खोळंबल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्रालयाने या परीक्षांना परवानगी दिली आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार विद्यापीठ परीक्षा घेण्यात याव्यात, असं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
लॉकडाऊनमुळे विद्यापीठ परीक्षा रखडल्या होत्या. पण देशातील लॉकडाऊन खोलण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशात आता अनलॉक दोनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. यानुसार केंद्र सरकारकडून अनेक गोष्टांना परवानगी देण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने विद्यापीठ परीक्षांना परवानगी दिली आहे. पण यासाठी विद्यापीठांनी यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांचे आणि निश्चित केलेल्या परीक्षा प्रक्रियेचे काटेकोरपणे पालन करावे, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंदर्भात उच्च शिक्षण सचिवांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात विद्यापीठ परीक्षांना परवानगी देण्यातय येत असल्याचं गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.