मुंबई दि. २ फेब्रुवारी – शिक्षक उद्याच्या पिढीचे संस्कार घडवत असतो, त्याचं भविष्य घडवत असतो आज त्याचं शिक्षकांना आपल्या न्याय हक्कासाठी उन्हात बसुन आंदोलन करावं लागतं आहे यापेक्षा दुर्दैव असू शकत नाही. शिक्षकांना न्याय दिला नाहीत तर या शिक्षकांसोबतच विरोधी पक्षनेता म्हणून त्यांच्या आंदोसनात सहभागी होईल, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिला.
राज्यातील विना अनुदानित, अंशतः अनुदानित शाळांना शासनाने अनुदान देण्याचा निणर्य घेतला आहे. शासनाने घोषित केलेल्या वीस टक्के वाढीव अनुदानाची अंमलबजावणी होत नाही. यासाठी सर्व शिक्षक संघटना आझाद मैदान येथे एकवटल्या असुन काही दिवसापासुन आंदोलनाला बसले आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज आझाद मैदान येथे जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. तेव्हा त्यांना सागितले की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये रणजीत पाटील व आपल्या शिक्षकांचे काही प्रतिनिधी असतील यांच्या पुढाकाराने आपण अनुदान मंजूर केलं त्याची अंमलबजावणी झाली. पण आताच्या सरकारला शिक्षकांच्या न्यायासाठी वेळ नाही. बिल्डरांना प्रीमियर माफ करायला आणि दारूच्या दुकानांचे परवानांचे पैसे माफ करायला या सरकारला वेळ आहे अशी खोचट टिका दरेकर यांनी केली.
राज्यात बाकीच्या कर्मचा-यांना आणि कामगारांना वेगळा न्याय आणि शिक्षक २४ तास सरकारसाठी काम करतं त्यांना वेगळा न्याय हा कोणता न्याय आहे. आता सरकार कोणाचेही असू दे त्यांनी लोकांसाठी काम करायची असतं. मागचा झालेला निर्णय हा सरकार म्हणून पाहायचा असतो. परंतु नव्या सरकारने वाढीव अनुदानाची अंमलबजावणी अजूनही केली नाही. परंतु जो शिक्षक उद्याच्या पिढीला घडवतो त्याला अनुदान द्यायला सरकारला वेळ नाही अशी टिका दरेकर यांनी केली.
शिक्षकांच्या मानसिकतेचा विचार करा. हा शिक्षक समाजाला, त्यांचा मानसिकतेला घडवत असतो. शिक्षकाला आंदोलकांच्या भूमिकेत यावं लागतं असेल तर ते राज्यकर्त्यांच अपयश आहे असा आरोप दरेकर यांनी केला.
बच्चू कडू शिक्षक राज्यमंत्री आहेत. बच्चू कडू रस्त्यावर उतरून आंदोलन करताना आम्ही पाहिलं आहे. बच्चू कडू तुम्हाला आंदोलकांच्या वेदना आणि संवेदना माहीत आहेत. जर तुम्हाला शिक्षकांच्या वेदना काळात असतील तर शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी अनुदानाची अंमलबजावणी त्वरित करावी अशी मागणी दरेकर यांनी केली.
काही शिक्षकांची शिक्षक सेवेचे काही महिने उरले आहेत. त्यांना अनुदान दिले नाही तर त्यांचे काही बरे वाईट झाल्यानंतर तुम्ही अनुदान येणार का? असा सवाल उपस्थित करत दरेकर म्हणाले जनगणनेच्या वेळी तुम्हाला शिक्षक आठवतो. मग न्याय देण्यासाठी शिक्षक आठवत नाही का? वाढती महागाई आहे आणि हे शिक्षक तुटपुंज्या पगारात दिवसभर राबत असतात. त्यांचे सर्व प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.