मुंबई-मालाड एस.वी रोडवरील रास्ता रुंदीकरणाच्या कामातून उद्भवलेल्या वादात आर्थिक गुन्हे शाखेने ( EOW) येथील व्यवसायिकांवर कारवाई केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने दोन व्यवसायीकांना अटक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई चुकीची असून तात्काळ त्या व्यवसायीकांना मुक्त करावे तसेच इतर व्यापाऱ्यांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत यासाठी आज खासदार गोपाळ शेट्टी व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने धरणे आंदोलन केलं..
विकासकाने आर्थिक गुन्हे शाखेची दिशाभूल केली आहे.. हा वाद विकासक व स्थानिक व्यवसायीकांचा असताना अश्याप्रकाची कारवाई करणं चुकीचं आहे. दोन व्यसायीकांना याठिकाणी अटक करण्यात आली आहे.. १४ दुकानदारांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.. अशी कारवाई करणं ही दडपशाही असून अश्या कारवाईचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते अश्या शब्दात दरेकर यांनी विकासकाला व आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना ठणकावले आहे… या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून दरेकर यांनी व्यवसायीकांवर दाखल खटले तात्काळ मागे घेण्यात यावे तसेच अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्यांना तात्काळ मुक्त करण्यात यावे अशी मागणी केली आहे..
या कारवाई विरोधात भारतीय जनता पार्टी व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभी आहे.. विकासकाविरोधात सुडाची भावना नाही पण स्थानिक व्यापाऱ्यांविरोधात अश्या प्रकारची कारवाई चुकीची आहे.. मागण्या मान्य होई पर्यंत हे आंदोलन असेच चालू राहील..असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले…