केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री, अमित शाह यांनी फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, 1947 मध्ये फाळणीचा फटका सहन करणाऱ्या लाखो लोकांना नमन केले आहे. अमित शाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “1947 मध्ये देशाची फाळणी झाली. हा भारतीय इतिहासाचा तो अमानवी अध्याय आहे जो कधीही विसरता येणार नाही. फाळणीच्या हिंसाचार आणि द्वेषाने लाखो लोकांचा बळी घेतला आणि असंख्य लोक विस्थापित झाले. आज फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त, फाळणीचा फटका सहन करणाऱ्या लाखो लोकांना मी नमन करतो.
केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, “फाळणी वेदना स्मृती दिनामुळे देशातील तरुण पिढीला फाळणीच्या वेळी लोकांनी भोगलेल्या यातना आणि वेदनांची आठवण करून दिली जाईल आणि ही घटना देशामध्ये सदैव शांतता आणि सलोखा राखण्यासाठी देशवासियांना प्रेरणा देत राहील.”