मुंबई-साकीनाका येथे घडलेली घटनेतील पीडित भगिनीच्या मृत्यूची बातमी मन विषण्ण करणारी आहे. वारंवार बलात्कारासारख्या घटना समोर येत आहेत. कायदयाचा कुठलाही वचप राहिलेला नाही. सरकारने वारंवार घडणाऱ्या निघृण बलात्काराच्या घटनांची जबाबदारी घ्यावी.राज्यात महिला अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली. शक्ती कायदा आणण्याच्या बाबतीत सरकारने अक्षम्य दिरंगाई दाखवली. भविष्यात अशा घटना घडू नयेत, महिला अत्याचार रोखले जावेत, अत्याचाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकार नेमके काय करणार आहे, याबाबतचा एक कृती आराखडा सरकारने येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील जनतेसमोर मांडावा, अशी मागणी आज पत्राद्वारे सरकारकडे केली.