मुंबई -१ऑगस्ट- भाजपाच्या कार्यकर्त्यांनी बूथ रचना अधिक सक्षम केल्यास मुंबई शहराचा प्रत्येक वॉर्ड हा भाजपचा होईल. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचाच झेंडा महापालिकेवर फडकणार असल्याचा विश्वास विधानपरिषद विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.
दादर शारदा मंदिर येथे मुंबई भाजप अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वातखाली समर्थ बूथ अभियान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपिठावर आमदार अमित भाजापाचे मुंबई उपाध्यक्ष त्रिपाठी उपस्थित होते.भाजपच्या समर्थ बूथ अभियान या कार्यक्रमात देरकर यांनी मार्गदर्शन केले. निवडणुकीच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्वाची असून पक्षाच्या दृष्टीने, निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीच महत्व माझ्यासारख्या कार्यकर्त्याला माहीत आहे म्हणून बैठकी ला उपस्थित राहिल्याचे सांगताना दरेकर म्हणाले की, येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांचे आवाहन हे आपल्यासमोर आहे, मुंबईत सुमारे २५ वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे राज्यात ही त्यांची सत्ता आहे अशा वेळेला सगळ्या आवाहनांना सामोरं जात असताना आपल्या पक्षाची बुथ रचना अधिक सक्षम करावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे विश्वनेतृत्व, भाजपचा चेहरा, तर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे अभ्यासू व विश्वासार्ह नेतृत्व राज्यात आहे. हिंदुत्वाच्या विचारधारेसोबत आपण सर्व आहात. भाजापमध्ये विकासच व्हिजन असल्याचे सांगतानाच दरेकर म्हणाले की, एका कार्यकर्त्याने किमान १० कुटुंबाशी संपर्क ठेवला तर त्या दहा कुटुंबाचा डाटा, त्यांचे प्रश्न हे कार्यकर्त्यांकडे असतील, त्यामुळे त्या दहा कुटुंबाचा कुटूंबप्रमुख म्हणून मतदारांना जोडून घेतलं पाहिजे, मुंबईत अनेक प्रश्न असून अजूनही मुंबईसारख्या शहरात अनेक भागांमध्ये घरांत पाणी शिरते. यंदाच्या पावसात अनेक कुटुंबियांची घरे पाण्याखाली गेली. त्यामुळे अनेक वर्षे सत्तेवर राहून सुध्दा सत्ताधा-यांनी मुंबईच्या सोयी सुविधांकडे लक्ष दिले नाही. आजही सर्वसामान्यांमध्ये याची चीड आहे. २५ वर्षाच्या शिवसेनेचा नाकर्तेपणा जनतेसमोर उघड केला पाहिजे प्रवीण दरेकर यांनी स्पष्ट केले.