पुणे- येथील आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्यासह चौघांवर, दारू विक्रीच्या व्यवसायाचा परवाना मिळवून देतो असे सांगून एकाची 1 कोटी ९२ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी औरंगाबाद पोलिसात, न्यायालयाच्या आदेशाने सुमारे २ महिन्यांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर, कारवाई होत नाही असा आरोप करत फिर्यादी विलास चव्हाण यांनी ,आपल्यावर आता आत्महत्या करण्याची वेळ आल्याचा इशारा दिला आहे तर औरंगाबाद पोलिसांनी मात्र या प्रकरणी पोलीस तपास सुरु आहेच ..आणि लवकरच आरोपींवर कारवाई होईल असे स्पष्ट केले आहे .यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री कांबळे यांच्यावर कारवाई होणार कि त्यांना क्लीनचीट मिळणार या प्रश्नाकडे राजकीय वर्तुळात उत्सुकतेने पाहिले जाणार आहे . याप्रकरणाची हकीकत अशी कि ,यापूर्वीच औरंगाबाद येथे दाखल झालेल्या या गुन्ह्यासंदर्भात काही आरोपींचा जामीन न्यायालयाने फेटाळल्यानंतर आता पोलिसांनी कारवाई होईल असे सांगितले आहे .तर ‘मी कर्ज काढून या व्यवसायाच्या परवान्यासाठी पैसे दिल्याने आता माझ्यावर बँका जप्तीच्या कारवाई साठी प्रयत्नशील झाल्या आहेत यामुळे मला आत्महत्येशिवाय मार्ग उरलेला नाही असे फिर्यादी चव्हाण यांनी म्हटले आहे . यातील आरोपी सत्ताधारी पक्षाशी संबधित आहेत तर फिर्यादी राष्ट्रवादी पक्षाशी संबधित आहेत यामुळे याप्रकरणी भक्कम तपास करून सबळ पुरावे गोळा करून कारवाई करणे गरजेचे आहे .पण आता आम्ही लवकरात लवकर आरोपींवर कारवाई करणार असल्याचे औरंगाबाद पोलिसांनी म्हटले आहे . फिर्यादी विलास चव्हाण यांनी म्हटले आहे की, कांबळे आणि दिलीप काळभोर ,दयानंद वनंजे,सुनील मोदी अशा चोघांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार आपण केली आहे.त्यावरील कारवाई टाळण्यासाठी काही आरोपींनी आपल्याला काही रकमेचे चेक दिले होते पण ते न वटता परत आलेत .न्यायालयाने या संदर्भात आपण न्यायालयात सादर केलेल्या प्राथमिक पुराव्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे . त्यानंतर आरोपींना अटक होणे गरजेचे होते . यातील काही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केले तेहि न्यायालयाने फेटाळले आहेत . मी वैजापूर बँकेतून कर्ज काढून यांना पैसे दिले आहेत काही रक्कम आर् टीजे एस द्वारे दिली तर काही रोखीने दिली आहे . त्याचा सर्व तपशील न्यायालय आणि पोलिसांना हि दिला आहे.पोलिसांवर आरोपी मंत्री असल्याने दबाव आहे,त्यामुळे कारवाई होत नाही . दरम्यान या प्रकरणाच्या बातम्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्यावरही ,अदयाप संबधित ज्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय त्या मंत्र्यांनी अद्याप या प्रकरणी कोणताही जाहीर खुलासा स्वतःहून केलेला नाही