मुंबई –संजय राऊत यांना तारीख पे तारीख देत १०२ दिवस तुरुंगात ठेवल्यानंतरही ईडी समाधानकारक तापास करू शकली नाही आणि पुरावे सादर करू शकली नाही त्यामुळे ईडी ला झापून न्यायालयाने राऊत यांना जामीन दिल्यावरही ईडी शांत बसलेली नाही आता संजय राऊत यांना मिळालेल्या जामीनाविरोधात ईडीकडून हायकोर्टात सुधारीत याचिका दाखल करण्यात आली आहे.या याचिकेवर २५ नोव्हेंबरला यावर सुनावणी होणार आहे.
मुंबई हायकोर्टात ईडीने ही सुधारित याचिका दाखल केली आहे, मागच्या वेळी न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ईडेनी याचिका दाखल केली होती, त्यामध्ये काही सुधारणा करून याचिका दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर ही नवीन याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यामुळे २५ नोव्हेंबरच्या सुनावणीदरम्यान नेमकं काय होतं याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.