मुंबई-मुंबईत नववर्षाच्या उत्सवादरम्यान संसर्गाचा धोका लक्षात घेता संपूर्ण शहरात 15 जानेवारीपर्यंत कलम 144 लागू करण्यात आली आहे. आता एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीवर बंदी असणार आहे. त्याचवेळी मुंबई पोलिसांनी लोकांना संध्याकाळी 5 ते पहाटे 5 या वेळेत समुद्रकिनारी, मोकळे मैदान आणि उद्यानात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
कोरोनाच्या नव्या नियमावलीनुसार महापालिकेच्या पथकासोबत पोलिसही कारवाईत सहभागी राहणार आहेत. याबाबत सर्व पोलिस पथक, पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.’ नागरिकांनी घरी राहून यंदाचा 31 डिसेंबर साजरा करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
परिस्थिती पाहता, महाराष्ट्र सरकारने मोकळ्या जागा किंवा हॉलमध्ये लोकांची जमवाजमव 50 पर्यंत मर्यादित केली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे 4,333 सक्रिय रुग्ण आहेत. त्याच वेळी, ओमायक्रॉनची 450 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत.