शहीद पोलिसाच्या कुटुंबाला १ कोटी
दिल्ली हिंसाः शहीद पोलिसाच्या कुटुंबाला १ कोटी
नवी दिल्लीः ईशान्य दिल्लीतील हिंसाचार हा दिल्लीतील नागरिकांनी नाही तर बाहेरचे आणि काही राजकारण्यांनी केला आहे. त्यांना जनतेत द्वेष पसरवायचा आहे. हिंसाचारात सर्वाधिक नुकसान हे दिल्लीकरांचे झाले आहे. यामुळे त्यांनी हिंसा नाही तर विकास निवडला पाहिजे, असं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली विधानसभेत म्हणाले
केजरीवाल म्हणाले, दिल्लीच्या जनतेला हिंसा नको आहे. काही असमाजिक, राजकीय आणि बाहेरच्या लोकांद्वारे हिंसाचार घडवून आणण्यात आला आहे. एक सामान्य माणूस हे सर्व करु शकत नाही. दिल्लीतील हिंदू आणि मुस्लिमांना आपसांत भांडण नको आहे.
या हिंसाचारात शहीद झालेले दिल्लीचे पोलीस हेडकॉन्स्टेबल रतनलाल यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीत सामावून घेतले जाईल, अशी घोषणाही यावेळी केजरीवाल यांनी केली.