मुंबई-
मेट्रो कारशेड बनविण्यासाठी गेल्या वर्षी तत्कालीन सरकारने मुंबई गोरेगाव येथील आरे कॉलनी ची रातोरात जंगल तोड केली ,अनेक झाडांचा खून केला ह्या विरोधात विदयार्थी भारतीने कडाक्याचे तीव्र आंदोलन केले .आरे वाचवा चा नारा देत निदर्शने केली !
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आरे ची ६०० ची एकर जमीन जंगल घोषित करण्यात आली ! विद्यार्थी भारतीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी सरकारच्या निर्णया चे स्वागत केले व २००० हून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली होती आता मात्र दुप्पट झाडे लावून त्याची मशागत करण्याची मागणी विद्यार्थी भारती संघटनेने केली आहे .
आरे जंगल नाही असा दावा तत्कालीन BJP सरकार ने केला होता , तसेच अभिनेता अमिताभ बच्चन यांनी आरे ची तुलना बागेतल्या झाडांशी केली होती ह्या विरोधात बिग बीं च्या बंगल्या बाहेर विद्यार्थी भारती ने निदर्शनं करून बच्चन याना ऑक्सिजन ची भेट देत चांगलीच कान उघडणी केली आरे आंदोलनात विद्यार्थी भारतीच्या २२ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती तरी विद्यार्थी भारती मागे हटली नाही लढा देत राहिली मेट्रो कारशेड साठी हजारो झाडांची कत्तल करून त्यावर निर्भर असणाऱ्या आदिवासी बांधवांच्या जीवनावर संकट आणले आरेत असणाऱ्या नानाविध प्रजातींचा गळा घोटला जाईल ! आरे वाचवा ह्या भूमिकेवर मात्र विद्यार्थी भारती संघटना ठाम राहिली व आज अखेर लढाईला यश आले असे राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी सांगितले .