नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचे आदेश असतानाही राज्यातील हिंदू संघटनांकडून भडकाऊ भाषणं होताना दिसत आहेत. यावर राज्य सरकार नियंत्रण ठेऊ शकलेलं नाही. त्यामुळं कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी कोर्टानं सरकारविरोधात याचिका दाखल केली असून त्यावर उत्तर देण्यास सांगितलं आहे. राज्य सरकारविरोधातील या याचिकेवर २८ एप्रिल रोजी सुनावणी घेणार असल्याचंही सुप्रीम कोर्टानं निश्चित केलं आहेयाप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मंगळवारी सांगितलं होतं की, “भडकाऊ भाषणं टाळणं हे जातीय सलोखा राखण्यासाठी महत्त्वाचं आहे. सुप्रीम कोर्टाचे असे स्पष्ट आदेश असताना गेल्या चार महिन्यांत राज्यात हिंदू संघटनांकडून किमान 50 मोर्चे काढण्यात आले असल्याचं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. या वृत्ताच्या आधारे सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्र सरकारच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका दाखल करण्याचं मान्य केलं होतं.दरम्यान, या अवमान याचिकेला उत्तर देण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले आहेत. यावर २८ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. यावेळी राज्य सरकारला या हेटस्पीच प्रकरणावर उत्तर द्यावं लागणार आहे.