राहुल गांधींच्या वर झालेल्या कारवाई बद्दल विविध स्तरावरून प्रतिक्रिया येत असताना प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनीही प्रतिक्रिया नोंदविली आहे त्यांनी ट्वीट करून म्हटले आहेकी,’ माझ्या प्रिय नागरिकांनो, या देशाच्या रहिवाशांनो, आजच्या प्रकारानं देशाच्या राजकारणाची लाज वाटावी अशी परिस्थिती आहे. जो काही प्रकार झाला आहे त्याला काय म्हणावे असा प्रश्न आहे. अतिशय हिणकस आणि किळसवाण्या गोष्टीनं मनाला खूप वेदना झाल्या आहेत.राजकीय क्षेत्र किती वेगळ्या थराला गेले आहे हे दिसून आले आहे. आणि आपण अजनुही शांत बसणार असाल तर पुढे याबाबत किंमत मोजावी लागेल , वेळ गेलेली नाही. देशासाठी बोलण्याची वेळ आली आहे. अशा शब्दांत प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरुन केलेली कमेंट ही अनेकांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर गांधींवर गुन्हा दाखल झाला आणि न्यायालयानं त्यांना दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि अपिलासाठी मुदत दिली . मात्र ती संपण्यापूर्वीच आज तर त्यांची खासदारकी रद्द झाल्याच्या बातमीनं मोठी खळबळ उडाली आहे.