बॉलिवूडचे प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमधील एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, मुंबई हल्ल्याचे सूत्रधार येथे खुलेआम फिरत आहेत. उर्दू शायर फैज अहमद फैज यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी अख्तर लाहोरला पोहोचले होते. कार्यक्रमादरम्यान एका व्यक्तीने त्यांना विचारले की, तुम्ही अनेकदा पाकिस्तानात आला आहात. तुम्ही परत जाल तेव्हा तुमच्या लोकांना सांगाल की, पाकिस्तानी चांगले लोक आहेत? या प्रश्नाच्या उत्तरात अख्तर म्हणाले – आपण एकमेकांवर आरोप करू नये. यामुळे कोणताही प्रश्न सुटणार नाही. मुंबईवर कसा हल्ला झाला ते आपण पाहिले आहे. ते दहशतवादी नॉर्वे किंवा इजिप्तमधून आलेले नव्हते. ते दहशतवादी तुमच्याच देशात मोकळेपणाने फिरत आहेत. त्याविरोधात भारतीयांनी तक्रार केली आहे. त्यांना याचा त्रास आहे.
लता मंगेशकर यांच्या पाकिस्तानातील परफॉर्मन्सच्या मुद्द्यावरही जावेद अख्तर यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही भारतात नुसरत फतेह अली खान आणि मेहदी हसन यांचे मोठे कार्यक्रम केले आहेत. दुसरीकडे लता मंगेशकर यांचा एकही कार्यक्रम तुमच्या देशात झालेला नाही.आपण एकमेकांवर आरोप करून काही साधणार नाही