मुंबई-भारतरत्न सचिन तेंडुलकर कुस्तीपटूंच्या आंदोलनप्रश्नी तुम्ही गप्प का? काही महिला लैंगिक अत्याच्याराविरोधात उठवत आहेत. मात्र, तुमच्यातील माणुसकी गेली कुठे? असे सवाल करणारे होर्डिंग मुंबई प्रदेश युवक काँग्रेसने सचिनच्या मुंबईतल्या घरासमोर लावलेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सचिनच्या मौनावर टीका केली होती. आता सचिन यावर तरी काही बोलणार का, हे एनारा कालच सांगेल
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी असताना ब्रिजभूषण सिंह यांनी महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. त्यांच्या अटकेची मागणी करत साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट यांनी 23 एप्रिलपासून धरणे आंदोलन सुरू केले. नव्या संसद भवनाच्या उदघाटनादिवशी या इमारतीसमोर महापंचायत भरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे आंदोलन पोलिसांनी मोडून काढले.
खेळाडूंनी आपली पदके गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, शेतकरी नेत्यांनी त्यांचे मन वळवले. कुस्तीपटूंच्या आंदोलनाला फिरकीपटू अनिल कुंबळे, बॉक्सर विजेंदर सिंह, भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी पाठिंबा दिला. मात्र, इतर खेळाडूंनी या आंदोलनाची दखलही घेतली नाही. त्यामुळेच सचिन तेंडुलकरवरही टीका होत आहे.
सचिन तेंडुलकरच्या घरासमोर मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्ता रंजीता गोरे यांनी मोठे फलक लावले होते. मत विरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी भारताच्या अंतर्गत बाबीमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का? शेतकरी आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला सणसणीत उत्तर तुम्ही दिलं होतं की आमच्या देशांतर्गत प्रश्नात तू नाक खुपसू नको… आणि आज मात्र सचिन तुझे तेच देश प्रेम कुठे गेले आहे??, असे विचारण्यात आले आहे.