राष्ट्रवादीच्या बैठकीत प्रफुल्ल पटेलांनी मांडले 2 प्रस्ताव
मुंबई-येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक सुरू झाली आहे . प्रफुल्ल पटेल यांनी दोन प्रस्ताव मांडले. त्यातला पहिला प्रस्ताव शरद पवार यांनी अध्यक्षपदी कायम रहावेत. तर दुसरा प्रस्ताव शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर केल्याचा आहे.जे एकमताने मंजूर करण्यात आले आहेत .निवड समितीत हे २ ठराव मंजूर करण्यात आले आहेत .
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. आणि समितीत झालेल्या निर्णयाची माहिती दिली तेव्हा त्यांनी आपल्या निर्णयासाठी थोडा वेळ हवा असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती पटेल पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
अध्यक्ष निवडीच्या समितीत कोण आहे?
प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के.के. शर्मा, पी.सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड तसेच नरहरी झिरवळ, फौजिया खान,धीरज शर्मा, सोनिया दूहन यांचा समावेश आहे.
प्लॅन ए आणि प्लॅन बी काय होते ते पहा …
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्य समिती आज दोन महत्त्वाचे प्रस्ताव मांडणार होती . प्लॅन ए आणि प्लॅन बी असे दोन महत्त्वाचे प्रस्ताव समितीकडून मांडले जातील. पहिल्या प्रस्तावात शरद पवार यांनी आपल्या पदावर कायम राहावं असा निर्णय समिती देणार आहे.
पहिल्या प्रस्तावाला शरद पवार कायम नसतील तर मात्र समिती दुसरा प्रस्ताव मांडणार होती . दुसऱ्या प्रस्तावात एकमतानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या अध्यक्ष म्हणून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना समर्थन द्यावं, असं सुचवण्यात येणार आहे.
शरद पवारांनंतर सुप्रिया सुळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीया सुळेंच्या व्यतिरिक्त इतर कोणाचंही नाव चर्चेत नाही, अशी माहिती मिळत होती.
– शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला आहे. शरद पवारच राहणार अध्यक्ष. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतला मोठा निर्णय.
– समितीची शिफारस शरद पवारांना कळवणार. पवारांनी समितीचा निर्णय यापूर्वीच मान्य असल्याचे म्हटले आहे. आता ते काय निर्णय घेतील, याकडे लक्ष आहे.
– कार्यकर्त्याने अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या भावुक झालेल्या कार्यकर्त्याला इतरांनी रोखले.
– मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्त्याने आत्महदहनाचा प्रयत्न केला.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर विविध जिल्ह्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देऊन ते प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. प्रदेशाध्यक्षांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे. शरद पवार यांच्या निर्णयानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तीव्र धक्का बसला आहे. पवार यांच्या नेतृत्वाची महाराष्ट्र राज्य व देशाला आजच्या कठीण काळात अत्यंत आवश्यक्ता आहे.
शरद पवार यांनी जाहिर केलेल्या निर्णयानंतर धाराशीव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील शेतकरी बळवंत थिटे यांनी शेतातील चिंचेच्या झाडावर चढून सत्याग्रह आंदोलन सुरू केले आहे. शरद पवारांनी संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्ते पदाधिकारी यांना विश्वासात घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा होता, अशी प्रतिक्रिया या शेतकऱ्याने दिली आहे.
गावागावातून लोक थिटे यांच्या शेतात
बळवंत थिटे हे पवारांचे जुने कार्यकर्ते आहेत. शरद पवार यांनी पंतप्रधान व्हावे यासाठी या शेतकऱ्याने 1993 ते 2014 या काळात आपली दाढी वाढवून समर्थन केले होते. आता देखील ते थिटे करत सत्याग्रहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. तसेच थिटे यांचे हे झाडावर चढून सुरु असलेले आंदोलन पाहण्यासाठी गावागावातून लोक थिटे यांच्या शेतात येत आहेत.