मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये लॉबी वाद चांगलाचे पेटताना दिसला. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रणावत हिने राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने थेट केला आहे.
‘मुंबई पोलीस स्पष्टपणे पक्षपात करत आहेत. मला चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. पण करण जोहरला नाही. त्याच्या ऐवजी पोलिसांनी त्याच्या मॅनेजरला समन्स पाठवलं. असं का?’ साहेबांना त्रास होवू नये का? असा प्रश्न यावेळी तिने उपस्थित केला आहे.
त्यानंतर पुन्हा एकदा ट्विट करत तिने थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नाही.’ सुशांतच्या हत्येची थट्टा करणं थांबवा असं देखील ती ट्विटमध्ये म्हणाली आहे.
दरम्यान सुशांतची आत्महत्या नसून ही हत्या असल्याच्या चर्चा सध्या सोशल मीडियावर जोर धरू लागल्या आहेत. सध्या पोलील याप्रकरणी चौकशी करत आहेत. एक महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी हाती काही लागले नसल्यामुळे ही केस पोलिसांऐवजी CBIकडे सोपवण्यात यावी अशी मागणी त्याची गर्लफ्रेंड रिया हिने अमित शाह यांच्याकडे केली होती.