मुंबई – वाय श्रेणीची सुरक्षा घेऊन मुंबईकडे निघालेली कंगना बीएमसीकडून झालेली ऑफिसची तोडफोड… त्यांचे फोटो प्रवासात पाहत ट्विटरवार करत मुंबईत दाखल झाली .
अभिनेत्री कंगना रनोट तिने ठरवल्याप्रमाणे बुधवारी म्हणजे 9 सप्टेंबर रोजी मुंबईत दाखल झाली . मुंबई विमानतळावर कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. शिवाय विरोध आणि समर्थकांची मोठी गर्दी देखील होती. दरम्यान व्हीआयपी गेटऐवजी दुस-या गेटमधून बाहेर पडत कंगना विमानतळावरून थेट आपल्या घरी दाखल झाली.
कंगना विमानतळावरुन उतरत असताना तिला इंडिगोच्या वाहनातून पोलिस सुरक्षेत घरी पाठवण्यात आले. समोरच्या गेटऐवजी मागील बाजूने कडक सुरक्षेत तिला घरी पाठवण्यात आले.मुंबई विमानतळावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसला. शिवसेनेची कामगार सेना, रामदास आठवले यांच्या रिपब्लिक पार्टी आणि करणी सेनेचे लोक मोठ्या संख्येने मुंबई विमानतळावर हजर होते. केंद्र सरकारने कंगना रनोटला वाय प्लस श्रेणीची सुरक्षा पुरविली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवर तिच्या सुरक्षेसाठी कडक बंदोबस्त ठेवला होता. पण या सर्वांचा काही उपयोग झाला नाही. मुंबई पोलिस आणि सीआरपीएफची फौजही तैनात करण्यात आली होती.कंगनाच्या विरोधात शिवसेनेने विमानतळात आपले शेकडो कामगार जमा केले होते. दुसरीकडे कंगनाच्या समर्थनार्थ करणी सेनेच्या महिला कार्यकर्त्या देखील झेंडे-फलक घेऊन हजर होत्या. दोन्ही बाजूंनी कंगनाच्या समर्थन व विरोधात घोषणाबाजी केली गेली.
एकीकडे मुंबईत ऑफिसवर बीएमसी ची कारवाई होत असताना ,दुसरीकडे कंगनाने प्रवासात केलेले हे ट्वीट-मी चुकीचे नव्हतेच ,माझी मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी झाल्याचेच या कारवाईने सिद्ध झाले आहे.
ऑफिसवर बीएमसी ची कारवाई होत असताना कंगनाने केलेल्या या ट्वीट मध्ये पाडापाडी च्या फोटो ला ‘पाकिस्तान ‘ असे कॅप्शन दिले आहे.
जेव्हा सकाळीच कारवाई सुरु झाली तेव्हा तिथे पोहोचलेले पोलीस आणि ,महापालीकेचे अधिकारी कर्मचारी यांचे फोटो शेअर करत कंगनाने त्यास’ बाबर आणि त्यांची आर्मी असे हेडिंग दिले आहे