उत्तराखंड: उत्तराखंडच्या जोशीमठ इथे अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. जोशीमठात मोठा हिमकडा कोसळल्याने धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पाण्याच्या प्रचंड प्रवाहाबरोबर अनेकजण वाहून गेल्याची भीती व्यक्त येत आहे. त्यामुळे जोशीमठ तालुक्यात अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. आज सकाळी 10.55 वाजता ही दुर्घटना घडली.
जोशीमठ तालुक्यातील रैणी गावात हिमकडा कोसळला. त्यामुळे या धौली गंगा नदीला महापूर आला आहे. त्यातच या धरणाचा कडाही तुटल्याने या ठिकाणी पाणीच पाणी झाले असून अनेक घरे आणि माणसे वाहून गेले आहेत. निसर्गाच्या या प्रकोपामुळे उत्तराखंडमध्ये एकच हाहाकार माजला असून या ठिकाणी अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.मोठा हिमकडा कोसळून नदीला महापूर आल्याने पुराचे पाणी घराघरात शिरले आहे. त्यामुळे धरणाजवळची अनेक गावं या पुरात वाहून गेली आहेत. तसेच माणसे, गुरेढोरेही वाहून गेली असून शेतीचंही मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.
गृहमंत्री अमित शहांचे मदतीचे आश्वासन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी तातडीने मुख्यमंत्री रावत यांच्याशी फोनवरून चर्चा केली आहे. तसेच, सर्व प्रकारची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या टीमही उत्तराखंडला पाठवण्यात येत असल्याचे शहांनी सांगितले.
या ठिकाणी प्रशासानाचे कर्मचारी आणि रेस्क्यु ऑपरेशन टीम पोहोचली असून युद्धपातळीवर रेस्क्यु ऑपरेशन सुरू आहेया महाभयंकर घटनेवर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. टचमोली जिल्ह्यात ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्कालीन विभागांना आपत्ती निवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खबरादारीचे सर्व उपाय योजले जात आहेत, असं रावत यांनी सांगितलं.
उत्तराखंड दुर्घटनेत ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पही वाहून गेला, १५० जण बेपत्ता
उत्तराखंडातील जोशीमठाजवळ हिमकडा कोसळल्यानंतर मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला आहे. १०७० किंवा ९५५७४४४४८६ या क्रमांकावर नागरिक मदत मिळवण्यासाठी संपर्क साधू शकतात
– मी स्वत: घटनास्थळी दाखल होत आहे, कृपया अफवा पसरवू नका : मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांचं आवाहन
– आयटीबीपीच्या दोन टीम्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या तीन टीमला देहरादूनहून घटनास्थळी धाडण्यात आलंय. तसंच आणखीन तीन टीम्स सायंकाळपर्यंत हवाईदलाच्या हेलिकॉप्टर्सच्या मदतीनं घटनास्थळी पोहचवली जाणार आहेत.
आयटीबीपीचे १०० हून अधिक जवान तातडीनं बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी देहरादूनमधून टीम्स धाडण्यात आल्या आहेत.
– एसडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनही घटनास्थळी मदत उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करत आहेत. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत : नित्यानंद राय, केंद्रीय गृह राज्यमंत्री
– प्रशासनाकडून चमोली, देवप्रयाग, कर्णप्रयाग आणि श्रीनगरमध्ये लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका
या संपूर्ण घटनेवर मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चमोली जिल्ह्यातमध्ये ही दुर्घटना घडली असल्याचे वृत्त आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि आपत्कालीन विभागांना आपत्ती निवारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. खबरादारीचे सर्व उपाय केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.