मुंबई-
राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना विनयभंग प्रकरणी ठाणे कोर्टाकडून आज मोठा दिलासा मिळाला आहे. 15 हजारांच्या जातमुचकल्यावर आव्हाडांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना विवियाना माॅल प्रकरणी अटक आणि जामीन मिळाला होता. त्यानंतर कळवा पुलाच्या उद्गघाटन कार्यक्रम आटोपल्यानंतर गर्दी सारून पुढे जाताना महिलेला त्यांनी बाजूला केले होते. या महिलनेने आपला विनयभंग झाला असा आरोप जितेंद्र आव्हाड यांच्यावर लावला. त्यानंतर या प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाच्या गुन्ह्याची नोंदही करण्यात आली होती.
न्यायालयाकडून दिलासा
मुंब्रा येथे रविवारी (ता. 13) रात्री कार्यक्रमादरम्यान घडलेल्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांनी याच प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात धाव घेतली होती. यावर आज सुनावणी झाली असून आव्हाडांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला हा त्यांना दिलासा मानला जात आहे.