श्रीनगर/नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये अस्वस्थतेच्या वातावरणात रविवारी रात्री १२ वाजता श्रीनगरमध्ये तीन माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. पोलिसांनुसार, संवेदनशील जम्मू-काश्मीरमध्ये रात्री १२ वाजता कलम-१४४ लागू करण्यात आले. जाहीर सभा-मोर्चांवर बंदी घालण्यात आली. मोबाइल इंटरनेट बंद करण्यात आले. सोमवारी सर्व शाळा-कॉलेज बंद राहतील. काँग्रेस नेते उस्मान माजिद व माकप आमदार एम. वाय. तारिगामी यांनी रात्री ट्विट करून आपल्याला ताब्यात घेतले जात असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, दिवसा गृहमंत्री अमित शहा व एनएसए अजित डोभाल यांची दिल्लीत बैठक झाली. दुसरीकडे श्रीनगरमध्ये फारुख अब्दुल्लांच्या निवासस्थानी मेहबूबा मुफ्ती आणि स्थानिक पक्षाच्या नेत्यांची बैठक झाली. या नेत्यांनी केंद्राच्या कारवाईचा निषेध केला.
जम्मू-काश्मीरमधील सर्व शाळा, कॉलेज बंद, सोमवारच्या परीक्षाही रद्द
> ११ वाजता मोबाइल इंटरनेट बंद केले. यामुळे काश्मीरमधून बातम्या बाहेर येणेच बंद झाले.
> राजभवनात ११.३० वाजता सुरक्षेबाबत बैठक सुरू झाली. दीड तास बैठक चालली आणि कलम १४४ लागू.
> रात्री १२.०० वाजता सुरक्षा दलांनी फारुख अब्दुल्लांच्या घरी बंदोबस्त वाढवला, श्रीनगरमध्ये चौक्या वाढवल्या.
> रात्री १२.०० वाजता श्रीनगरच्या लाल चौकास सुरक्षा दलांच्या तुकड्यांनी घेरले.
काश्मीर खोऱ्यातील नेत्यांना कठोर कारवाईची भीती…
रात्री ११ वाजता उमर अब्दुल्लांचे टि्वट…
‘आज मध्यरात्री मला घरातच नजरकैद केले जातेय असे वाटत अाहे. काश्मीरच्या अन्य प्रमुख नेत्यांना अटक करण्यासाेबत ही प्रक्रिया सुरू झाली आहे. अल्लाहच आता आमचे रक्षण कराे.’
रात्री ११.३४ वाजता मेहबूबांचे टि्वट…
‘माेबाइल कव्हरेजसह इंटरनेट सेवा बंद झाल्याच्या बातम्या येत अाहेत. संचारबंदीचे पासही जारी केले जात ऐहेत. अल्लाह जाणाे, काश्मीरमध्ये उद्या काय हाेईल. मला वाटते ही खूप लांबणारी रात्र ठरतेय.’
काश्मीरवर निर्णयाची वेळ आली : पाक पंतप्रधान
काश्मीरच्या स्थितीबाबत पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनीही इस्लामाबादमध्ये लष्कराचे उच्चाधिकारी व राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक घेतली. या वेळी त्यांनी काश्मीरवर निर्णयाची वेळ आल्याचे सांगितले. इम्रान खान यांनी यूएनला त्वरित हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
सरकार दहशतीचे वातावरण तयार करतेय : मेहबूबा
मेहबूबा म्हणाल्या, यात्रेकरू, पर्यटक, मजूर, विद्यार्थी व क्रिकेटपटूंना हटवले जात आहे. दहशत निर्माण केली जात आहे, मात्र या स्थितीत काश्मिरींना दिलासा किंवा सुरक्षा देण्याचा कोणताही प्रयत्न केला जात नाही. कुठे गेली माणुसकी, काश्मिरियत व लोकशाहीॽ
दिल्ली : साधारणपणे बुधवारी होणारी मंत्रिमंडळ बैठक सोमवारी सकाळीच बोलावली आहे.
> सोमवारी सकाळी ९.३० वाजता मंत्रिमंडळाच्या बैठकीत काश्मीरवर चर्चा होईल.
> अमित शहा संसद अधिवेशनानंतर ८ ते १० ऑगस्टला काश्मीर दौऱ्यावर जाऊ शकतात.
> जम्मू-काश्मीरमधील आर्थिक दुर्बल घटकांना १०% आरक्षण देणारे विधेयक शहा सोमवारी राज्यसभेत मांडतील.
श्रीनगर : एअर इंडियाच्या भाड्यावर ६ हजारांची मर्यादा, विविध संस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
> पोलिसांनी हॉटेलमध्ये बैठक घेण्याची परवानगी नाकारली. मेहबूबांच्या घरी आयोजित बैठक अचानक उमर अब्दुल्लांच्या निवासस्थानी झाली.
> इरफान पठाणसह १०० क्रिकेटपटू काश्मीरमधून बाहेर. सुरक्षा वाढवली.
> एअर इंडियाने कमाल भाडे ६ हजार केले. श्रीनगर-दिल्ली भाडे १० हजार रुपयांपर्यंत गेले होते.