मुंबई –
खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगावे की जे माझ्यासोबत झाले हीच त्यांच्या पक्षाची परंपरा आहे का?, असेच महिलांना ढकलून त्यांच्या पक्षात बाजूला सारले जाते का? हीच शिकवण राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिली जात आहे का, असा सवालही राशीद यांनी उपस्थित केला. यावर महाराष्ट्र महिला आयोग काय प्रतिक्रिया देते याकडे माझे लक्ष आहे. माझ्याकडून महिला आयोग कधी उभे राहणार का हे देखील मी पाहणार आहे. त्यांच्याकडे मी जाईलच, पण ते माझ्याकडे आले तर बरे वाटेलआहे.राष्ट्रवादी काँग्रेसची हीच परंपरा आहे का, असा सवाल रीदा राशीद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंना केला आहे. माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी मला पकडून धक्का देत गर्दीत ढकल्याचा आरोपही रीदा राशीद यांनी पत्रकार परिषदेत केला.
धक्का लागतो आणि पकडून धक्का देणे यात फरक आहे. जितेंद्र आव्हाडांनी अनेक पुरुष उभे असलेल्या ठिकाणी मला ढकलले. महिला चांगले काम करते. तिच्या मागे हेच का लागतात, असा सवालही राशीद यांनी उपस्थित केला आहे.
काल मुंब्र्याला उड्डानपुलाचे उद्घाटन होते. यावेळी निमंत्रितामध्ये मी देखील होते. यावेळी मी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जात असताना स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांना स्माइल केले. यानंतर आव्हाडांनी माझ्या हाताला जोरात पकडत, तू इथे काय करते म्हणत त्यांनी मला पुरुषांच्या अंगावर ढकलले, असा आरोप रीदा राशीद यांनी केला. आपण हा सर्व प्रकार पोलिसांना सांगितला असता त्यांनी पोलिस ठाण्यात जात माहिती देण्याचे सांगितल्याने आपण ही सर्व माहिती दिली आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असे म्हणत रीदा राशीद यांनी आपली बाजू मांडली.
जितेंद्र आव्हाड यांनी सर्वांना एका हाताने बाजूला केले आणि मी महिला असताना दोन्ही हातांनी पकडून मला बाजूला केले. यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण जी कारवाई सर्वांवर व्हायला हवी ती त्यांच्यावर करण्यात यावी, अशी माझी अपेक्षा असल्याचे मतही रीदा रशीद यांनी व्यक्त केले. मी साधारण महिला म्हणून माझी मतदारसंघात ओळख आहे. लोकांना मी भाजपची म्हणून जास्त चर्चेत नसते, असेही राशीद यांनी सांगितले आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून किंवा असा काही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.