मुंबई- महापालिका निवडणूक जवळ आली आहे. त्यासाठीच भाजप दुसऱ्या पक्षातून आमदार, खासदार एवढेच काय तर स्वप्नही चोरत आहे. त्यामुळे हा पक्ष आहे की चोरबाजार?, अशी खरमरीत टीका शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. काल षण्मुखानंद सभागृहात ‘मुंबई इलेक्ट्रीक वर्कर्स युनियन’चा सुवर्ण महोत्सवाचा कार्यक्रम काल पार पडला. या कार्यक्रमात उद्धव ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी केलेल्या आपल्या भाषणात उद्धव ठाकरेंनी बंडखोर शिंदे गट आणि भाजपवर टीका केली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, आचार विचार काहीही नसलेल्या भाजपला सत्तापिपासूप्रमाणे मुंबई मिळवण्याची हाव लागली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात मोदींचे नाही तर बाळासाहेबांचे नाव घेतल्याशिवाय कुणीही मतं देणार नाही. यासाठी भाजप शिवसेनेची, बाळासाहेबांची स्वप्न चोरत आहेत. हा पक्ष आहे की चोरबाजार?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, कंत्राटी कामगारांप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्रीदेखील कंत्राटी आहेत. त्या पदावर किती वेळ राहणार हे त्यांनाच माहीत नाही.