पोटशेफस्ट्रूम: १९ वर्षाखालील आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताच्या युवा संघाने पाकिस्तानच्या युवा संघाचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्तानने दिलेले १७३ धावांचे आव्हान टीम इंडियाने १० गडी राखून सहजपणे पार केले. भारताचा सलामीचा फलंदाज यशस्वी जयस्वालने या महत्त्वाच्या सामन्यात शतकी खेळी साकारली. तर, दिव्यांश सक्सेनाने नाबाद ५९ धावांची खेळी साकारली. यशस्वीला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
सामन्यात यशस्वी जायसवालने नाबाद 105 तर दिव्यांश सक्सेनाने नाबाद 59 धावा काढल्या. या दोघांनी टूर्नामेंटमध्ये दुसऱ्यांना शतकी भागीदारी केली आहे. यापूर्वी त्या दोघांनी न्यूजीलँडविरोधात नाबाद 115 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडू कर्णधार रोहैल नजीरने सर्वाधिक 62 आणि हैदर अलीने 56 धावा काढल्या. भारतासाठी सुशांत मिश्राने 3 आणि कार्तिक त्यागी आणि रवी बिश्नोईने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
दुसऱ्यांदा दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये समोर-समोर
विश्वचषकात दुसऱ्यांदा दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये समोरा-समोर आल्या आहेत. मागच्या वेळेस 2018 मध्ये भारताने पाकिस्तानला 203 धावांनी मात दिली होती. दोन्ही संघात आतापर्यंत झालेल्या 9 सामन्यात भारत 4 आणि पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध मागील आठ वर्षात हरलेला नाही.
भारताच्या सुशांत मिश्राने २८ धावा देत तीन गडी बाद केले. त्यानंतर कार्तिक त्यागी आणि रवि बिश्नोई यांनी प्रत्येकी दोन, अर्थव अंकोलेकर आणि जयस्वालने प्रत्येकी एक गडी बाद केला. पाकिस्तानकडून रोहेल नझीर ६२ धावा, हैदर अली ५६ आणि मोहम्मद हॅरीस २१ धावा यांनी भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. इतर फलंदांजांनी मात्र झटपट तंबूची वाट पकडली.