नवी दिल्ली- राजधानीतील उत्तर-पूर्व भागात झालेल्या हिंसाचारात आम आदमी पार्टीचे नगरसेवक ताहिर हुसैनचा हात असल्याच्या आरोपांवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, ”वातावरण खराब करणारे कोणत्याही पक्षाचे असू शकतात, पोलिसांनी त्याच्यावर कारवाई करावी. जर आपचा एखादा नेता यात दोषी आढळला, तर त्याला दुप्पट शिक्षा द्या. देशाच्या सुरक्षेत कोणतीच तडजोड केली जाणार नाही.
केजरीवालांनी हिंसाचार झालेल्या भागांमध्ये प्रभावितों के लिए नुकसान भरपाईची घोषणा केली. मृतांच्या कुटुबियांना 10 लाख रु., गंभीर जखमींना 2 लाख रु., ज्यांचे घर जळाले, त्यांना 5 लाख रु. आणि अपंग झालेल्यांना 5 लाखांची भरपाई केली जाईल.
केजरीवाल म्हणाले की, ज्यांची दुकाने किंवा संपत्तीला नुकसान पोहचले, त्यांना भरपाई देण्यासाठी विशेष कँप लावले जातील. ज्यांच्या गाड्या जळाल्या, त्यांच्यासाठी विमा कंपन्यांना बोलवून वेगले कँप सुरू केले जातील. ज्या नागरिकांची दुकाने जळाली आणि रोजगार गेला, अशांसाठी दिल्ली सरकारचा अर्थ विभाग सहाय्यता देईल. ज्यांची कागदपत्रे जळाली, अशा नागरिकांनाही विशेष मदत केली जाईल. ई-रिक्शा जळाल्यावर 25 हजार रुपयांची मदत केली जाईल. सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींच्या उपचारासाठी दिल्ली सरकार मदत करेल. फरिश्ते योजनेअंतर्गत खासगी रुग्णालयातील जखमींवर मोफत उपचार होईल.
पोलिसांनी 18 एफआयआर दाखल केल्या
दिल्ली पोलिसांनी आतापर्यंत 18 एफआयआर दाखल करुन 106 जणांना अटक केली आहे. आता पोलिसांचे लक्ष शेजारील राज्यातून येऊन दिल्लीत दंगा करणाऱ्यांवर आहे. शेकटो व्हॉट्सअॅप ग्रुप आणि व्हायरल व्हिडिओची तपासणी केली जात आहे. रविवार ते मंगळवारपर्यंत झालेल्या हिंसाचारादरम्यान दिल्लीची सीमा उघडी होती. त्यामुळे दंगलखोर यूपीमार्गे दिल्लीत आल्याचा संशय पोलिसांना आहे.