राज्याचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाचा राज्याचा निकाल 90.66 टक्के इतका लागला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे. यंदा निकाल 4.78 टक्क्यांनी वाढला आहे. नेहमीप्रमाणे निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 93.88 टक्के लागला. तर मुलांचा निकाल 88.04 टक्के लागला आहे. तर कोकण विभागाने राज्यात बाजी मारली आहे. कोकणचा निकाल 95.89 एवढा लागला आहे. तर सर्वात कमी औरंगाबाद विभागाचा निकाल लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 88.18 टक्के एवढा लागला आहे. उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर 16 जुलै रोजी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे.
शाखा निहाय निकाल
- कला शाखा निकाल : 82.63 टक्के
- वाणिज्य शाखा निकाल : 91.27 टक्के
- विज्ञान शाखा निकाल : 96.93 टक्के
- MCVC : 95.07 टक्के
कोणत्या विभागाचा निकाल किती टक्के?
- कोकण विभाग 95.89 %
- औरंगाबाद 88.18 %
- पुणे 92.50 %
- नागपूर 91.65 %
- मुंबई 89.35 %
- कोल्हापूर 92.42 %
- अमरावती 92.09 %
- नाशिक 88.87 %
- लातूर 89.79 %
ही सर्व माहिती राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष डाॅ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.
खालील वेबसाईटसवर पाहता येईल बारावीचा निकाल
- www.mahresult.nic.in
- www.hscresult.mkcl.org
- www.maharashtraeduction.com
पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडली होती. यावर्षी बारावीच्या परिक्षेसाठी एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण 9923 कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आणि पूर्ण राज्यातील जवळपास 3036 परिक्षा केंद्रांवरुन ही बारावीची परिक्षा घेण्यात आली. यामध्ये सगळ्यात जास्त 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी विज्ञान शाखेचे होते, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 134, तर वाणिज्य शाखेचे 3 लाख 86 हजार 784 विद्यार्थी होते.